शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

जिल्ह्यात ९ हजार टन युरियाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाहतूकीची अडचण असल्याने जिल्ह्याला होणारा खत पुरवठा विस्कळीत झाला आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वाहतूकीची अडचण असल्याने जिल्ह्याला होणारा खत पुरवठा विस्कळीत झाला आहे़ यातून आजअखेरीस मागणी केलेल्या खताच्या तुलनेत ९ हजार टन खताची तूट निर्माण झाली आहे़ ही तूट येत्या १५ दिवसात भरुन न निघाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे़यंदाच्या हंगामात जिल्ह्यात दोन लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या होणार असल्याचा अंदाज आहे़ यासाठी १ लाख १८ हजार टन खताची मागणी कृषी विभागाने केली होती़ या मागणीनुसार ९८ हजार टन खत कृषी संचालनालयाकडून मंजूर करण्यात आले होते़ जून ते सप्टेंबर या काळात हे खत वेळोवेळी मिळणे अपेक्षित होते़ परंतू जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा असून आजअखेरीस केवळ २५ टन खतांचा पुरवठा झाला असून अद्यापही ९ हजार टन खताची आवश्यकता आहे़दरम्यान पावसाने सर्व तालुक्यात सरासरी हजेरी लावली असल्याने पेरण्यांचा वेग कायम आहे़ येत्या काळात दमदार पाऊस येईल या अपेक्षेतून या पेरण्या सुरू आहेत़ यातून जिल्ह्यात आजअखेरीस २ लाख ३० हजार हेक्टरच्यापुढे पेरण्या झाल्या आहेत़ पेरणी केलेल्या पिकांना युरियाची मात्रा देणे गरजेचे असल्याने शेतकरी तालुकामुख्यालय किंवा गावातील खत विक्रेत्याकडे हजेरी लावत असून खताच्या तुटवड्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत असल्याचे चित्र अद्याही कायम आहे़ कृषी विभागाकडे पुरवठा करणाºया सातपैकी पाच युरिया उत्पादक कंपन्यांनी सुमारे २५ हजार ५०० टन खतांचा पुरवठा केला आहे़ परंतु मागणीनुसार अद्यापही आठ हजार खताचा पुरवठा होणे गरजेचे आहे़ शेतकºयांना दुसºया आणि तिसºया टप्प्यात खतांची आवश्यकता असल्याने त्यांच्याकडून कृषी केंद्रांवर गर्दी वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिसून येत आहे़कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी ७० हजार २६० टन युरिया, ७ हजार ८५० टन डीएपी, ७ हजार ८४० टन एमओपी, ११ हजार ५०० टन एसएसपी तर २० हजार ७१० टन मिश्र खतांची मागणी केली होती़ या मागणीवर ४७ हजार ३०० टन यूरीया, ५ हजार २०० डीएपी, ९ हजार ८०० एमओपी, १७ हजार १५० एसएसपी तर १९ हजार ४८० टन मिश्र खते मंजूर करण्यात आली होती़ हे खत जिल्ह्याच्या वाट्याला जून आणि जुलै महिन्यात येण्याची अपेक्षा होती़ परंतू जुलै संपण्यात येऊन यातील मिश्र खत वगळता युरियाचा पूर्णपणे पुरवठा झालेला नाही़जुलै अखेर जिल्ह्यात ३२ हजार ६३७ टन युरिया लागत असल्याने कृषी विभागाने खत कंपन्यांकडून तशी मागणी नोंदवली होती़ परंतु प्रत्यक्षात आजअखेरीस २२ हजार ९८६ टन युरियाचा पुरवठा करण्यात आला़ दोंडाईचा येथे आलेले रॅक टप्प्याटप्प्याने उतरवले जात होते़ आजअखेरीस ९ हजार ६५१ टन युरियाची जिल्ह्यातील शेतकºयांना गरज आहे़ हा युरिया मिळण्यास विलंब होत असल्याने तालुका मुख्यालयी असलेल्या कृषी सेवा केंद्र, खरेदी विक्री संघ याठिकाणी खत घेण्यासाठी गर्दी होत आहे़ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगारांची घटलेली संख्या खत पुरवठ्यात अडचणी आणत असल्याचे कंपन्या सांगत आहेत़ कृषी विभाग कंपन्याकडे सातत्याने खतासाठी पाठपुरावा करत असून लवकरच खताचा पुरवठा होईल अशी माहिती देण्यात आली आहे़खत उत्पादक कंपन्यांकडून देण्यात येणाºया रॅकमधून कमी प्रमाणात खताचा पुरवठा होत आहे़ तालुकानिहाय खतांची टंचाई असली तरी योग्य पद्धतीने नियमन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ खतांची आवक झाल्यानंतर तातडीने त्यांचा पुरवठा करण्यात येईल यासाठी कृषी विभागाकडून अधिकारी नियुक्त करणयात आले आहेत़-पी़एस़लाटे, कृषी विकास अधिकारी, नंदुरबाऱ