शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

या शौर्याचे आसमंती दीप उजळू दे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:41 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशसेवेत असणा:या आपल्या जवानांप्रती प्रत्येकाला आदर आणि अभिमान असतो. परंतु सैताणे, ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशसेवेत असणा:या आपल्या जवानांप्रती प्रत्येकाला आदर आणि अभिमान असतो. परंतु सैताणे, ता.नंदुरबार या गावाला आपल्या भुमिपूत्र सैनिकाचा अभिमान काही औरच आहे. 15 ते 20 वर्ष देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावून सेवानिवृत्तीनंतर गावी परतलेल्या जवानाचे स्वागत सैताणे करांनी आपल्याच थाटात केले. भव्य मिरवणूक, सामुहिक सत्कारात बालगोपाळांसह अबालवृद्ध सहभागी झाले. या अनोख्या स्वागताच्या कार्यक्रमाचा अभिमान आणि चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.   पूर्वी सैन्य दलात भरती होणे म्हणजे जसे युद्धात सहभागी होणे असे समजले जात होते. घरची मंडळी सहसा राजी होत नव्हती. परंतु सध्याची तरुणाई सैन्यदलात भरतीसाठी मोठय़ा प्रमाणावर उत्सूक आहे. नंदुरबार तालुक्याचा विचार करता आसाणे आणि सैताणे या गावातील अनेक तरुण मोठय़ा संख्येने सैन्यदलात सेवेत आहेत. त्याचा अभिमान या दोन्ही गावांना आहे. या दोन्ही गावातील सैनिक सेवानिवृत्त होऊन गावी परतल्यावर त्यांचा भव्यदिव्य सत्कार आणि स्वागत करण्याची परंपरा आता या दोन्ही गावांनी सुरू केली आहे. सैताणे येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या सैनिकाचा स्वागताचा भव्यदिव्य कार्यक्रम आणि मिरवूणक प्रत्येक सैनिकाचा आणि देशप्रेमी नागरिकाचा ऊर भरून येईल अशीच होती.गावातील सुपूत्र रावसाहेब जगन्नाथ पाटील हे नुकतेच आर्मि एअर डिफेन्समधून सेवानिवृत्त झाले. त्यांची जास्तीत जास्त सेवा ही जम्मू-कश्मिरमध्येच झाली. त्यामुळे कायम सतत एकीकडे शत्रू आणि दुसरीकडे आतंकवादी या दोन्ही आघाडींवर त्यांना लढावे लागत होते. परिणामी त्यांच्यासह पंचक्रोशीतील सैन्यदलात असणा:या जवानांविषयी नेहमीच चिंता वाटत होती. आता रावसाहेब सेवानिवृत्त होऊन गावी परतले. ते परतणार असल्याची माहिती मिळताच गावातील तरुण मंडळींनी एकत्र येत आपल्या भुमिपूत्राचा सन्मान त्याच अभिमानाने आणि देशप्रमाणे करायचे ठरविले. पाटील हे थेट जम्मूहून गावी आल्यावर गावाच्या वेशीवरच त्यांचे भव्य स्वागत झाले. डीजे, बॅण्डच्या निनादात आणि देशप्रेमाच्या घोषणांनी आसमंत दुमदूमन गेला. निघालेली मिरवणूक प्रत्येकाच्या हृद्याचा ठाव घेणारी आणि देशसेवेविषयी ऊर भरून निघणारी ठरली. सामुहिक सत्कार आणि त्यातून झालेले मनोगतं प्रत्येकाच्या  मनात आणि हृद्यात देशाविषयी किती अभिमान भरला आहे हे दर्शविणारी होती. एका अनोख्या उपक्रमाचे साक्षीदार ठरल्याचा अभिमान गावक:यांना आहे. 

अनोखी मिरवणूक..जवान रावसाहेब पाटील, त्यांची प}ी, आई-वडिल यांना एका सजविलेल्या  उघडय़ा जीपमध्ये बसविण्यात आले. गावाच्या वेशीपासून त्यांची डिजे आणि बॅण्डच्या तालावर मिरवणूक निघाली. गावातील मुख्य भागातून मिरवणूक    विठ्ठल मंदीर चौकात आली. तेथे संपुर्ण गावाने जवान पाटील यांचा सन्मान      केला. पाटील यांनीही आपले अनुभव  कथन करून यातून तरुणांना चांगली   प्रेरणा मिळावी आणि प्रत्येक सैनिकाचा असा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रत्येक भूमिपूत्राचाकरणार सन्मान.. सेवानिवृत्तीनंतर गावी परतणा:या प्रत्येक भुमिपूत्र सैनिकाचा असेच आणि यापेक्षा अधीक जोमाने स्वागत करण्याचा निर्धार सैताणे करांनी केला आहे. यामुळे तरुणांमध्ये सैन्यदलाप्रती आकर्षण आणि कर्तव्यभावना जागृत होऊन जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवा करावी हा उद्देश असल्याचे  सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.डी.जी.पाटील यांनी सांगितले. सैताणे गाव नेहमीच विविध उपक्रमात आघाडीवर असते. प्रत्येक ग्रामस्थाला गावाचा अभिमान आहे. या गावाने आता देशसेवा, प्रशासकीय, पोलीस, शिक्षण आणि इतर सेवेत असणा:यांना अशाच पद्धतीने गौरविण्याचे ठरविले आहे. इतरांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे माजी सरपंच बापू पाटील यांनी सांगितले.