शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

परप्रांतीय येणाऱ्या मजुरांचा ओघ कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : परप्रांतीय मजुर, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सुमारे २४ हजार लोकांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत पोहोचविण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : परप्रांतीय मजुर, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सुमारे २४ हजार लोकांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. आता परप्रांतात जाणारे कुणीच येत नसल्याने आठवडाभर गजबजलेल्या सीमा परिवहन तपासणी नाक्याच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. सीमेवर वाहनांची तपासणी आता सख्त करण्यात आली आहे.मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडीसा, उत्तरप्रदेश व झारखंड या राज्यातील मजूर मोठ्या संख्येने गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामावर असल्याने लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. आपल्या घराकडे सायकल व पायी तथा मिळेल त्या साधनांचा वापर करीत घराकडे परतणाºया मजूर व कामगारांच्या सेवेत राज्य शासनाने लालपरी दाखल करून दिली. राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. १० मे पासून हे कार्य सुरू झाले होते.सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांची दिवसेंदिवस संख्या वाढत गेल्याने नवापूर आगार व जिल्ह्यातील इतर आगारांमधील जवळपास १०० बसेसच्या जोडीला औरंगाबाद विभागातील ७५, जळगांव विभागातून ५० व धुळे विभागातून १०० बसेस असे मिळून २२५ जादा बसेस नवापुरात दाखल झालेल्या होत्या. गेल्या मंगळवारी सायंकाळी एकाचवेळी सात हजाराहुन अधिक लोकांचा जमाव तेथे आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. दररोज सीमेवर हजारोंच्या संख्येने लोक येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सीमेवर भेटी दिल्या होत्या. भेटीनंतर त्यांनी समाधान व्यक्त केले होते.सीमा तपासणी नाक्यावरून मध्यप्रदेशच्या सीमेवर सर्वाधिक १९ हजार ८८८ प्रवाश्यांसाठी बसेसच्या ९०७ फेºया, छत्तीसगड सीमेवर दोन हजार ३७६ प्रवाश्यांसाठी बसेसच्या १०८ फेºया व राज्यांतर्गत एक हजार २७६ प्रवाशांसाठी बसेसच्या ५८ फेºया झाल्या. राज्य परिवहन महामंडळाने यासाठी एक कोटी ९६ लाख २१ हजार ३८५ रूपये खर्च करून २३ हजार ५४० प्रवाशांच्या घरवापसीचे कार्य पार पाडले.गुजरातमधून मजूर व कामगारांची आवक थांबल्याने सध्या सीमेवरील इतर आगारांच्या आलेल्या सर्व बसेस माघारी झाल्या आहेत. सर्व स्थानिक बसेसही आगारात आल्याने सीमेवर शुकशुकाट आहे.लॉकडाऊनमुळे महामार्गावर जेवणाची सोय नसतांना प्रवासी, चालक व वाहकांची जेवणाची समस्या नवापूर शहरातील जागृत नागरीक, सामाजिक व धार्मिक संघटनांकडून अविरत सुरू ठेवण्यात आलेल्या अन्नदान मोहिमेमुळे सुटू शकली. हे कार्य लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते अविरतपणे पार पाडत आल्याने प्रवासी व चालक वाहकांची बºयाच अंशी सोय होऊ शकली.