लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : परप्रांतीय मजुर, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सुमारे २४ हजार लोकांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. आता परप्रांतात जाणारे कुणीच येत नसल्याने आठवडाभर गजबजलेल्या सीमा परिवहन तपासणी नाक्याच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. सीमेवर वाहनांची तपासणी आता सख्त करण्यात आली आहे.मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडीसा, उत्तरप्रदेश व झारखंड या राज्यातील मजूर मोठ्या संख्येने गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामावर असल्याने लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. आपल्या घराकडे सायकल व पायी तथा मिळेल त्या साधनांचा वापर करीत घराकडे परतणाºया मजूर व कामगारांच्या सेवेत राज्य शासनाने लालपरी दाखल करून दिली. राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. १० मे पासून हे कार्य सुरू झाले होते.सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांची दिवसेंदिवस संख्या वाढत गेल्याने नवापूर आगार व जिल्ह्यातील इतर आगारांमधील जवळपास १०० बसेसच्या जोडीला औरंगाबाद विभागातील ७५, जळगांव विभागातून ५० व धुळे विभागातून १०० बसेस असे मिळून २२५ जादा बसेस नवापुरात दाखल झालेल्या होत्या. गेल्या मंगळवारी सायंकाळी एकाचवेळी सात हजाराहुन अधिक लोकांचा जमाव तेथे आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. दररोज सीमेवर हजारोंच्या संख्येने लोक येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सीमेवर भेटी दिल्या होत्या. भेटीनंतर त्यांनी समाधान व्यक्त केले होते.सीमा तपासणी नाक्यावरून मध्यप्रदेशच्या सीमेवर सर्वाधिक १९ हजार ८८८ प्रवाश्यांसाठी बसेसच्या ९०७ फेºया, छत्तीसगड सीमेवर दोन हजार ३७६ प्रवाश्यांसाठी बसेसच्या १०८ फेºया व राज्यांतर्गत एक हजार २७६ प्रवाशांसाठी बसेसच्या ५८ फेºया झाल्या. राज्य परिवहन महामंडळाने यासाठी एक कोटी ९६ लाख २१ हजार ३८५ रूपये खर्च करून २३ हजार ५४० प्रवाशांच्या घरवापसीचे कार्य पार पाडले.गुजरातमधून मजूर व कामगारांची आवक थांबल्याने सध्या सीमेवरील इतर आगारांच्या आलेल्या सर्व बसेस माघारी झाल्या आहेत. सर्व स्थानिक बसेसही आगारात आल्याने सीमेवर शुकशुकाट आहे.लॉकडाऊनमुळे महामार्गावर जेवणाची सोय नसतांना प्रवासी, चालक व वाहकांची जेवणाची समस्या नवापूर शहरातील जागृत नागरीक, सामाजिक व धार्मिक संघटनांकडून अविरत सुरू ठेवण्यात आलेल्या अन्नदान मोहिमेमुळे सुटू शकली. हे कार्य लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते अविरतपणे पार पाडत आल्याने प्रवासी व चालक वाहकांची बºयाच अंशी सोय होऊ शकली.
परप्रांतीय येणाऱ्या मजुरांचा ओघ कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:17 IST