शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यात महिलांचे घटते प्रमाण चिंताजनक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांपर्यंत पोहचली असून दशवार्षिक वृद्धीदर मात्र २५ ते २६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांपर्यंत पोहचली असून दशवार्षिक वृद्धीदर मात्र २५ ते २६ टक्केदरम्यान कायम आहे. चिंतेची बाब म्हणजे हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण घटत असून ते आता ९४२ पर्यंत आले आहे. त्यामुळे ‘लेक वाचवा’ अभियानाला गती देणे गरजेचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या ७० टक्के आहे.

देशात १९६१ पासून दर दहा वर्षांनी लोकसंख्येची गणना केली जाते. त्यासाठी वर्षभर जनगणना करण्याचे काम देशापातळीवर केले जाते. यंदा गेल्या वर्षी आधुनिक पद्धतीने जनगणना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या शिरकावमुळे जनगणनेचे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाला कधी सुरूवात होईल व यावेळची दशवार्षिक लोकसंख्या किती वाढली हे कळण्यास आणखी काही कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.

वृद्धीदर २५ टक्केपर्यंत

जिल्ह्याचा लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धीदर हा यावेळीही २५ ते २६ टक्केच्या दरमन्याच राहिला आहे. १९६१ पासून दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर पाहिला तर १९६१ मध्ये २५.३१होता. १९७१ मध्ये तो घटून २१.४५ टक्के झाला. १९८१ च्या जनगणनेत २२.४६ टक्केवर पोहचला. १९९१ मध्ये वाढून वृद्धीदर २५.३० टक्के झाला. २००१ मध्ये कमी होऊन २३.३८ टक्के झाला तर २०११ मध्ये पुन्हा २५ टक्केच्या वर अर्थात २५.६६ टक्के झाला. २०२१ अर्थात आता अंदाजे लोकसंख्या वृद्धीदर जवळपास २५.६० टक्के इतका आहे.

लोकसंख्येतील तफावती आणि असमतोल...

n जनगणना करताना जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले आहेत. नागरी भागात शहरांची संख्या नऊ आहे. त्यात नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांच्या शहरांसह वडफळ्या, खापर, खांडबारा, मक्राणीफळी या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार अ वर्ग पालिका, शहादा ब वर्ग पालिका तर नवापूर व तळोदा क वर्ग पालिकेत असून खापर, वडफळ्या, खांडबारा, मक्राणीफळी, अक्कलकुवा या गणना शहरांचा समावेश आहे.

nनंदुरबार जिल्हा आदिवासी लोकसंख्या बहुल जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. एकूण लोकसंख्येच्या ७० टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. त्यात २०११ च्या जनगणनेनुसार अक्कलकुवा तालुक्यात ८५.२५ टक्के, धडगाव तालुक्यात ९५.९४ टक्के, तळोदा तालुक्यात ७७.४४ टक्के, नवापूर तालुक्यात ८५.८२ टक्के, नंदुरबार तालुक्यात ४५.५७ तर शहादा तालुक्यात ५४.२० टक्के लोकसंख्या आहे. त्यात नवीन जगनणनेत आणखी भर पडणार आहे.

n२०२१ ची जनगणना ही आधुनिक पद्धतीने करण्यात येणार होती. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. संबंधित घटकांची काही प्रशिक्षणे देखील झाली होती. साधारणत: मे २०२० मध्ये जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार होते. परंतु देशात मार्च २०२० पासूनच कोरोनाचा शिरकाव झाल्याने जनगणना स्थगित करण्यात आली आहे. आता केव्हा ती सुरू होते व नवीन आकडेवारी समोर येते याकडे लक्ष लागून आहे.