शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

जिल्ह्यात महिलांचे घटते प्रमाण चिंताजनक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांपर्यंत पोहचली असून दशवार्षिक वृद्धीदर मात्र २५ ते २६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांपर्यंत पोहचली असून दशवार्षिक वृद्धीदर मात्र २५ ते २६ टक्केदरम्यान कायम आहे. चिंतेची बाब म्हणजे हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण घटत असून ते आता ९४२ पर्यंत आले आहे. त्यामुळे ‘लेक वाचवा’ अभियानाला गती देणे गरजेचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या ७० टक्के आहे.

देशात १९६१ पासून दर दहा वर्षांनी लोकसंख्येची गणना केली जाते. त्यासाठी वर्षभर जनगणना करण्याचे काम देशापातळीवर केले जाते. यंदा गेल्या वर्षी आधुनिक पद्धतीने जनगणना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या शिरकावमुळे जनगणनेचे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाला कधी सुरूवात होईल व यावेळची दशवार्षिक लोकसंख्या किती वाढली हे कळण्यास आणखी काही कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.

वृद्धीदर २५ टक्केपर्यंत

जिल्ह्याचा लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धीदर हा यावेळीही २५ ते २६ टक्केच्या दरमन्याच राहिला आहे. १९६१ पासून दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर पाहिला तर १९६१ मध्ये २५.३१होता. १९७१ मध्ये तो घटून २१.४५ टक्के झाला. १९८१ च्या जनगणनेत २२.४६ टक्केवर पोहचला. १९९१ मध्ये वाढून वृद्धीदर २५.३० टक्के झाला. २००१ मध्ये कमी होऊन २३.३८ टक्के झाला तर २०११ मध्ये पुन्हा २५ टक्केच्या वर अर्थात २५.६६ टक्के झाला. २०२१ अर्थात आता अंदाजे लोकसंख्या वृद्धीदर जवळपास २५.६० टक्के इतका आहे.

लोकसंख्येतील तफावती आणि असमतोल...

n जनगणना करताना जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले आहेत. नागरी भागात शहरांची संख्या नऊ आहे. त्यात नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांच्या शहरांसह वडफळ्या, खापर, खांडबारा, मक्राणीफळी या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार अ वर्ग पालिका, शहादा ब वर्ग पालिका तर नवापूर व तळोदा क वर्ग पालिकेत असून खापर, वडफळ्या, खांडबारा, मक्राणीफळी, अक्कलकुवा या गणना शहरांचा समावेश आहे.

nनंदुरबार जिल्हा आदिवासी लोकसंख्या बहुल जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. एकूण लोकसंख्येच्या ७० टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. त्यात २०११ च्या जनगणनेनुसार अक्कलकुवा तालुक्यात ८५.२५ टक्के, धडगाव तालुक्यात ९५.९४ टक्के, तळोदा तालुक्यात ७७.४४ टक्के, नवापूर तालुक्यात ८५.८२ टक्के, नंदुरबार तालुक्यात ४५.५७ तर शहादा तालुक्यात ५४.२० टक्के लोकसंख्या आहे. त्यात नवीन जगनणनेत आणखी भर पडणार आहे.

n२०२१ ची जनगणना ही आधुनिक पद्धतीने करण्यात येणार होती. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. संबंधित घटकांची काही प्रशिक्षणे देखील झाली होती. साधारणत: मे २०२० मध्ये जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार होते. परंतु देशात मार्च २०२० पासूनच कोरोनाचा शिरकाव झाल्याने जनगणना स्थगित करण्यात आली आहे. आता केव्हा ती सुरू होते व नवीन आकडेवारी समोर येते याकडे लक्ष लागून आहे.