शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पाईपलाईनचे काम तुर्त बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : इंडियन ऑईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : इंडियन ऑईल कंपनी व शेतकरी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यावर तोडगा काढण्यसाठी प्रशासनामार्फत कंपनीचे अधिकारी व शेतक:यांची  संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतक:यांच्या हरकती डावलून कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. यावर तोडगा निघत नसल्याने शेतक:यांचे समाधान होईर्पयत काम बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.नवापूर तहसिल कार्यालयात आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, पेट्रोलीयम पाईप लाईनच्या कामासाठी आलेले इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यात जमीन विवादावर चर्चेसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुनीता ज:हाड, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत,  कंपनीचे सक्षम अधिकारी तथा किशोर राजगुरू, कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक प्रणव चौरसिया, शेतक:यांचे प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, आर. सी. गावीत, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप गावीत आदी उपस्थित होते.शेतक:यांच्या शेतातील उभे पीक कापून इंडियन ऑइल कंपनीमार्फत अनधिकृतपणे पाईप लाईनचे काम केले जात असल्याचे आरोप करण्यात आला. शेतक:यांच्या जल, जंगल व जमीनीच्या मूळ हक्कावर गदा आणली जात आहे. शेतक:यांच्या हरकती असतांना शेतक:यांना विश्वासात न घेता कंपनी आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रय} करत असल्याचे आरोपही करण्यात आला. कंपनी आमच्या जमिनीवर इतर हक्क प्रस्थापित करु पाहत आहे, परंतु हे आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा निर्धार उपस्थित शेकडो शेतक:यांनी केला. कंपनीच्या वतीने वरिष्ठ प्रबंधक प्रणव चौरसिया यांनी कंपनीकडून कोणतीही दादागिरी व धमकीची भाषा वापरण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी टोकाची भूमिका घेत विरोध करतील, असा इशारा गावीत यांनी दिला. आपल्या मालकीच्या जमिनीवर कुठल्याही परिस्थितीत शेतकरी काम करू देणार नाही. वेळप्रसंगी हक्कासाठी न्यायालयात दाद मागितली जाईल असे शेवटी गावीत म्हणाले. यावर तोडगा निघत नसल्यामुळे जोर्पयत शेतक:यांचे समाधान होत नाही तोर्पयत काम बंद ठेवण्याचेकंपनीच्या अधिका:यांना सांगण्यात आले.

पेट्रोलीयम पाईपलाईनचे काम हे काही वर्षापासून प्रस्तवित होते. त्याला मंजूरी मिळाल्याने इंडियन ऑईल कंपनीमार्फत नवापूर तालुक्यातून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी कंपनीमार्फत दोन वर्षापासून कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यात काही अडथळे निर्माण झाले. त्यावर मात करीत काम मार्गी लावण्याची कार्यवाही देखील करण्यात आली. परंतु शेतक:यांमध्ये जागेच्या मबोदलाबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. सद्यस्थितीत हा वाद शिगेला पोहोचला असून शेतक:यांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनामार्फत बैठकही घेण्यात आली. परंतु त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे काम तुर्त बंद करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे शेतक:यांचे समाधान करण्यासाठी प्रय} होणार आहे. त्याला काही कालावधी लोटणार असून पेट्रोलीयम पाईपलाईनचे हे कामही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.