लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पपईच्या घसरत्या दराबाबत तळोदा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी एकवटले असून, व्यापाऱ्यांची मनमानी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एक हजार ८०० रूपये क्विंटल दर दिल्याशिवाय पपई न देण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.तळोदा तालुक्यातील पपईचे उत्पादन परिपक्वझाल्यामुळे पपई खरेदीसाठी बाहेरील व्यावसायिकदेखील खरेदीसाठी सक्रीय झाले आहेत. गेल्या आठवड्यापूर्वी पपईस क्विंटलला एक हजार ८०० रूपये दराने खरेदी करत असत. त्यानंतर एक हजार ५०० रूपये दर दिला. आता तर एक हजार २०० रूपयांनी खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी या व्यापाºयांच्या मनमानी कारभारावर व्यसन घालण्यासाठी पपई न देण्याचा निर्णय घेतला आहे.याप्रकरणी येथील कनकेश्वर मंदिरात गुरूवारी दुपारी तळोदा तालुक्यातील पपई उत्पादक शेतकºयांची बैठक घेतली. या वेळी पपईच्या दिवसेंदिवस घसरत्या दराबाबत शेतकºयांनी चर्चा केली. दिल्लीतील कोहरा, जाळपोळ या घटनांमुळे वाहतूक व मालास मागणी होत नसल्याचे कारण पुढे करत व्यापारी आपल्या मनमानीपणे पपईचे दर कमी करीत आहेत. यामुळे एकप्रकारे शेतकºयांची आर्थिक लूटच करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. वास्तविक यंदा तालुक्यातील अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे पपई बरोबर सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. साहजिकच शेतकºयांनी त्यावर केलेला रासायनिक खतांचा वापर व इतर खर्चदेखील निघणार नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे, असे असतांना व्यापारी थातूर-मातूर कारण पुढे करून पपईचा दर दिवसेंदिवस कमी करीत आहे.व्यापाºयांच्या अशा अडवणुकीच्या धोरणाबाबत शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त करून जो पावेतो हे व्यापारी क्विंटल मागे एक हजार ५०० रूपये भाव देणार नाही तो पावेतो शेतकºयांनीही पपईची कटींग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जो शेतकरी देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. बैठकीत संजय पटेल, भरत पाटील, महेंद्र पाटील, भगवान पाटील, नरेंद्र पाटील, कपील भारती, राजेश पटेल, पंकज पाटील, राजाराम पाटील, तुंबा पाटील, मोहन पाटील, दीपक पाटील, आकाश पाटील, भानुदास माळी आदी शेतकरी उपस्थित होते.
अपेक्षित भाव मिळाला तरच पपई देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:18 IST