शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कर्जमाफीतील शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:17 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता व कोरोना ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता व कोरोना महामारीमुळे आठ महिने उशिरा होत असल्याने या वाढीव काळातील कर्जावरील व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही़ रिझर्व्ह बँकेच्या संकेतानुसार शासनानेच निर्णय घेतल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकºयांसाठी कर्जमाफीची योजना राबविली़ तथापि योजनेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका व त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूका लागल्या होत्या़ यामुळे या निवडणूक आचारसंहितेच्या कारणाने नंदुरबारसह गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नांदेड व नाशिक या सहा जिल्ह्यातील प्रक्रिया लांबली़ परिणामी तीन लाखापेक्षा अधिक शेतकºयांची कर्जमाफी रखडली होती़ नंदुरबार जिल्ह्यातील त्यात २७ हजार शेतकºयांचा समावेश होता़ निवडणूका पूर्ण होत नाही तोच कोरोना महामारीची समस्या निर्माण झाल्याने ही प्रक्रिया पुन्हा लांबली़ दरम्यान खरीप हंगाम सुरू झाल्याने कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना तांत्रिक कारणाने नवीन कर्ज मिळू शकत नव्हते़ त्यामुळे शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या त्याची दखल घेत शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे़नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपयांची रक्कम कर्जमाफीसाठी प्राप्त झाली आहे़ बँकांकडे रक्कम जमा झाल्यानंतर प्रक्रिया एक दोन दिवसात सुरू होणार आहे़ ही प्रक्रिया सुरू होत असताना अनेक शेतकºयांनी बँकांकडे संपर्क साधला़ त्यावेळी बँकांकडून अतिरिक्त कर्जाचा प्रश्न उपस्थित केला गेला होता़ कारण शासनाने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत लक्षात घेऊन कर्जमाफीची रक्कम ठरविली होती़ प्रत्यक्षात योजना अंमलबजावणीला विलंब झाल्याने ९ महिने अतिरिक्त झाले़ या ९ महिन्यांचे व्याज कोणी भरावे ? हा प्रश्न निर्माण झाला होता़ त्यामुळे शेतकºयांमध्ये पुन्हा चलबिचल सुरू झाली़ तथापि त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकºयांकडून अतिरिक्त व्याज आकारु नये असे शासनाच्या सूचना असल्याने आता अतिरिक्त व्याज शेतकºयांना भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़

कर्जमाफीची योजना सप्टेंबर २०१९ अखेरची रक्कम ठरवून करण्यात आली होती़ त्यामुळे पुढील व्याजाचा प्रश्न जरूर निर्माण झाला होता़ परंतु रिझर्व्ह बँकेनेच हे व्याज शेतकऱ्यांकडून बँकांनी आकारू नये अशी मार्गदर्शक सूचना केली आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे़ त्या शेतकºयांना अतिरिक्त व्याजाची रक्कम भरावी लागणार नाही़-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक़