शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

फलज्योतीषावर शहाद्यात रंगला वाद-संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : फलज्योतीष विज्ञान आहे का? या विषयावर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञानबोध वहिनी विभागाचे राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : फलज्योतीष विज्ञान आहे का? या विषयावर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञानबोध वहिनी विभागाचे राज्य कार्यवाहक प्रा.डॉ.नितीन शिंदे आणि बृहन महाराष्ट्र ज्योतीष मंडळ पुणेचे ज्योतीषरत्न नंदकिशोर जकातदार यांच्यात वाद-संवाद हा कार्यक्रम रंगला.कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगानचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्योतिषशास्त्र हा विज्ञानाचा पाया आहे असे सांगून ज्योतिषशास्त्र एका विशिष्ट वर्णात अडकल्याने त्याचा विकास होऊ शकला नाही. जिथे संवाद असतो तिथे शास्त्र असते, शास्त्र नियमावर आधारित असते तर विस्मृतीत येणारे ज्ञान म्हणजे विज्ञान. धर्म म्हणजे संस्कार म्हणूनच माणूस धर्माप्रमाणे जगतो. प्रारब्ध म्हणजे माणसाचे कर्म असते. ज्योतिष शास्त्रातील भोंदूगिरीवर त्यांनी नापसंती व्यक्त करून ही भोंदूगिरी थांबली पाहिजे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास न करता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते केवळ काही गोष्टींचा बाऊ करून उलट समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात, असा आरोपही त्यांनी केला. तर आपली भूमिका मांडताना डॉ.नितीन शिंदे यांनी पीपीटीद्वारे नक्षत्र, ग्रह, तारे, राशी यांचा मानवी जीवनावर काडीचाही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले. राशी म्हणजे काय? पत्रिका म्हणजे काय? सामान्य माणसाला याचे काहीही ज्ञान नसते. परंतु तरीही लोक लग्न जुळवताना पत्रिका बघतात, राशिभविष्य बघतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. हजारो किलोमीटर लांब असलेले ग्रह माणसाच्या जीवनात काहीही करू शकत नाही. नक्षत्र, राशी या संकल्पना बरोबर असल्या तरी त्याचा संबंध माणसाची जोडणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.डॉ.के.बी. पाटील यांनी ज्योतिषशास्त्रातील कर्मकांड थांबवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. या वेळी बृहन महाराष्ट्र ज्योतिषी मंडळाच्या कार्याध्यक्षा मालती शर्मा, आनंद कुलकर्णी, नयना जकातदार, शैलेश देशपांडे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ.रवींद्र टोणगांवकर, डॉ.शशांक कुलकर्णी, डॉ.अलका कुलकर्णी, हैदरअली नुरानी, डॉ.विश्वास पाटील, सरकारसाहेब रावल, डॉ.सुभाष फुलंब्रीकर, डॉ.दर्शन कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अंनिसचे विनायक सावळे यांनी केले.