शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात दर दीड दिवसाआड जातोय एकाचा प्राण

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: February 8, 2018 12:45 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष विचलीत करणारे ठरत आहेत़ प्रशासकीय कार्यतत्परतेला वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीची जोड मिळाल्यास अपघातांच्या मालिकांना नक्कीच ‘स्पीडब्रेकर’ निर्माण होऊ शकतो़ जिल्ह्यात रोजच छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या घटना घडत आह़े ही बाब अत्यंत चिंताजनक आह़े कारण गेल्या चार वर्षात तब्बल 652 जणांचा या भिषण अपघातात मृत्यू झाला आह़े विशेष म्हणजे 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजे 623 अपघातांच्या घटना घडल्या आहेत़ यातील ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातांची संख्या ही 154 असून त्यात तब्बल 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले आह़े रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या चार वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झाल्या दिसून येत आह़े गेल्या चार वर्षात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यामध्ये शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षामध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आह़े याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आह़े शहरी भागासह  ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आह़े त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की. अशीच दिसून येत आह़े दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आह़े जिल्ह्यातील पुलांची पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आह़े त्यामुळे अशा पुलांचे सव्रेक्षण  करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आह़े याबाबत ऑडीट होणे अपेक्षीत आह़े जिल्ह्यातील अपघातांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या चारही प्रशासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय साधत रस्ते अपघात रोखण्यासाठी व बचाव कार्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होत असतात़ त्यामुळे यावर काही तरी दुरगामी परिणामकारक ठरेल अशी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आह़े महामार्गावर अनेक ‘डेड स्पॉट’ आहेत़ पोलीस प्रशासनाकडून प्रामुख्याने नवापूर जवळील कळवन, वावद तसेच ठाणेपाडा हे तिन ‘डेड स्पॉट’ जाहीर करण्यात आले आह़े या तीन ठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यूची संख्या वाढली आह़ेमहामार्गावर ‘एचएसपी’ म्हणजेच ‘हायवे सेफ्टी पेट्रोल’ विभागाकडून पेट्रोलिंग करण्यात येत असत़े आवश्यक त्या ठिकाणी ‘रिफ्लेक्टर’देखील बसविण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आह़े अपघातावर आळा घालण्यासाठी सामाजिक बांधकाम विभागाशीही समन्वय साधला जात आह़े