शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात दर दीड दिवसाआड जातोय एकाचा प्राण

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: February 8, 2018 12:45 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह्यात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आह़े त्यामुळे हे आकडे संवेदनशिल व्यक्तींचे नक्कीच लक्ष विचलीत करणारे ठरत आहेत़ प्रशासकीय कार्यतत्परतेला वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीची जोड मिळाल्यास अपघातांच्या मालिकांना नक्कीच ‘स्पीडब्रेकर’ निर्माण होऊ शकतो़ जिल्ह्यात रोजच छोटय़ा-मोठय़ा अपघातांच्या घटना घडत आह़े ही बाब अत्यंत चिंताजनक आह़े कारण गेल्या चार वर्षात तब्बल 652 जणांचा या भिषण अपघातात मृत्यू झाला आह़े विशेष म्हणजे 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजे 623 अपघातांच्या घटना घडल्या आहेत़ यातील ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातांची संख्या ही 154 असून त्यात तब्बल 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले आह़े रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या चार वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झाल्या दिसून येत आह़े गेल्या चार वर्षात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यामध्ये शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षामध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आह़े याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आह़े शहरी भागासह  ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आह़े त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की. अशीच दिसून येत आह़े दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आह़े जिल्ह्यातील पुलांची पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आह़े त्यामुळे अशा पुलांचे सव्रेक्षण  करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आह़े याबाबत ऑडीट होणे अपेक्षीत आह़े जिल्ह्यातील अपघातांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या चारही प्रशासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय साधत रस्ते अपघात रोखण्यासाठी व बचाव कार्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होत असतात़ त्यामुळे यावर काही तरी दुरगामी परिणामकारक ठरेल अशी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आह़े महामार्गावर अनेक ‘डेड स्पॉट’ आहेत़ पोलीस प्रशासनाकडून प्रामुख्याने नवापूर जवळील कळवन, वावद तसेच ठाणेपाडा हे तिन ‘डेड स्पॉट’ जाहीर करण्यात आले आह़े या तीन ठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यूची संख्या वाढली आह़ेमहामार्गावर ‘एचएसपी’ म्हणजेच ‘हायवे सेफ्टी पेट्रोल’ विभागाकडून पेट्रोलिंग करण्यात येत असत़े आवश्यक त्या ठिकाणी ‘रिफ्लेक्टर’देखील बसविण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आह़े अपघातावर आळा घालण्यासाठी सामाजिक बांधकाम विभागाशीही समन्वय साधला जात आह़े