शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

भरदिवसा घरफोडय़ांचे सत्रामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरदिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोडी आणि तीन ठिकाणी झालेल्या प्रयत्नामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरदिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोडी आणि तीन ठिकाणी झालेल्या प्रयत्नामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ज्ञानदिप सोसायटी भागात चोरटय़ांनी दोन घरांमधून लाखोंचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, शहर पोलिसांची निष्क्रीयता पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. नंदुरबारात चो:यांचे सत्र सुरूच आहे. आता चोरटय़ांनी दिवसा या घरफोडी करून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ज्ञानदिप सोसायटी भागात दोन घरे फोडण्यात आली. प्लॉट नंबर 52 मध्ये राहणारे दगडू    रेवा नागरे हे नातेवाईकांच्या    लगAासाठी कुटूंबासह गेले होते. भर रस्त्यावरील बंद घर हेरून चोरटय़ांनी दुपारी दीड ते तीन वाजेच्या दरम्यान दरवाजाचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील कपाटातून त्यांनी 63 हजार रुपये किंमतीचा 21 ग्रॅम सोन्याचा नेकलेस आणि 11 हजार रुपये रोख असा एकुण 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. नागरे कुटूंबिय घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत  दगडू नागरे यांच्या फिर्यादीवरून     गुन्हा दाखल करण्यात आला        आहे.हाकेच्या अंतरावरच दुसरी घटना घडली. प्लॉट नंबर 60 मध्ये राहणारे सतिष विश्वास पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा देखील तोडलेला आढळून आला. पाटील हे देखील लगAासाठी बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी घरातील 21 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने व पाच हजार रुपये रोख असा एकुण 26 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. याबाबत सतिष पाटील यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात   आला. दोन्ही घटनांचा तपास फौजदार क्षिरसागर करीत आहे. दोन्ही ठिकाणी बेडरूम, किचन मधील सामान चोरटय़ांनी अस्तावस्त केलला होता. नागरे यांच्या घरात पोलिसांना फिंगर प्रिंट आढळून आले.  श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान परिसरातच घुटमळले. दरम्यान, रविवारी लगAतिथी मोठी असल्याने अनेक घरे बंद होती. चोरटय़ांनी इतरही दोन, तीन ठिकाणी चोरीचा प्रय} केल्याचे समोर येत आहे. काही प्रत्यक्षदर्श्ीच्या म्हणण्यानुसार, चोरटे चारचाकी वाहनातून आले होते. त्यापैकी तीनजण कारमध्ये बसून राहत होते तर एकजण चोरी करीत होता. त्यामुळे माहिती असलेल्यांकडूनच हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चोरीच्या या घटनांना शहर पोलिसांची निश्क्रियता कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. धुळे रोडवरील ज्ञानदीप सोसायटीसह या भागात यापूर्वी असलेल्या पोलीस निरिक्षक हे नियमित रात्रीची गस्त सक्तीची करीत होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या भागात रात्रीची गस्तच बंद झाली आहे. पोलीस निरिक्षकांची निष्क्रियतेमुळे गस्त बंद झाली आहे. पूर्वी प्रमाणे रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच दिवसा साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवून फेरीवाल्यांवर लक्ष ठेवावे अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. या भागात फेरीवाल्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. विविध वस्तू विक्रीसाठी दिवसभर फेरीवाले या भागात फिरत असतात. घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजताच ब्लँकेट विक्री करणारा या भागात आला होता. एवढय़ा सकाळी फेरीवाला कसा असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे पोलिसांनी फेरीवाल्यांवरही लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.