शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हवेच्या द्रोणीय भागामुळे नंदुरबारातील तापमानात घट.

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: May 24, 2018 12:57 IST

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी तापमानाचा पारा 42 अंशाच्या खाली येण्यास तयार नव्हता़ दरम्यान, समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर तयार ...

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी तापमानाचा पारा 42 अंशाच्या खाली येण्यास तयार नव्हता़ दरम्यान, समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या हवेच्या द्रोणीय भागामुळे पुढील एक ते दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े यामुळे खान्देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आह़े  दरम्यान, या पावसाचे प्रमाण अत्यंल्प राहणार असल्याने यामुळे कुठल्याही प्रकारे शेतीचे नुकसान होणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े उत्तर-पूर्व मध्यप्रदेश ते मध्य कर्नाटकार्पयत या वा:यांचा प्रभाव असल्याने याचा परिणाम खान्देशासह, मराठवाडा व विदर्भातही जाणवत आह़े दरम्यान, या द्रोणीय वा:यांमुळे तापमानात घट झाली असली तरी हे वातावरण निवळल्यावर पुन्हा तापमान वाढीची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आह़ेबुधवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान निर्माण झाले होत़े यामुळे सकाळी काहीसे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले होत़े दुपारी दीड वाजेर्पयत ढगाळ वातावरण कायम होत़े त्यानंतर काही प्रमाणात उन्हाचा पारा जाणवू लागला़ परंतु ऐरवीसारखा चटके देणारे तापमान बुधवारी नव्हत़े त्यामुळे सतत आग ओकत असलेल्या सूर्यापासून नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळाला़ हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी समुद्रसपाटीपासून साधारणत एक किलोमीटर अंतरावर वाहत असलेल्या वा:यांचा वेध घ्यावा लागत असतो़ सध्याच्या परिस्थतीत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर अंतरावर हवेचा द्रोणीय भाग निर्माण झाला आह़े द्रोणीय भागामध्ये हवा चक्राकार किंवा गोलाकार आकाराने फिरत असत़े यात हवेचा दाब कमी असतो़ अशा वातावरणामुळे ढगाळ हवामान निर्माण होऊ शकत़े असे वातावरण 72 तास कायम राहिल्यास प्रभावीत क्षेत्रामध्ये तुरळक पावसाचीही शक्यता निर्माण होत असत़ेपश्चिमेकडून येताय वारेअरबी समुद्रावर मोठय़ा प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिमेकडून मोठय़ा प्रमाणात वेगवान वारे वाहत आहेत़ या सर्व खगोलीय परिस्थितीमुळे वातावरणात वेगवान बदल होत आहेत़ अजून काही दिवस हा कमी दाबाचा पट्टा राहिल्यास तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आह़े रात्री वा:यांच्या गतीत वाढदिवसा आग ओकणा:या सूर्यामुळे सर्वसामान्य बेहाल झाले असले तरी, रात्रीच्या वेळी मात्र साधारणात ताशी 35 ते 40 प्रतिकिमी वेगाने वारे वाहत असल्याने यामुळे नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळत आह़े रात्रीच्या वेळी प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत़ या वा:यांचा वेग नुकसान करणारा नसला तरी, मध्यरात्री काहीशी थंडी जाणवत असत़े त्यामुळे उकाडय़ापासून आराम मिळावा यासाठी नागरिक घरांच्या छतावर झोपण्यास प्राधान्य देत असतात़ यंदा केरळात वेळेत मान्सून धडकणार असला तरी अंदमानात मान्सून वारे अडकून पडल्यास पावसाळा आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ हे सर्व वेळेवर निर्माण होणा:या खगोलिय परिस्थिती अवलंबून असल्याचेही कुलाबा वेधशाळेतर्फे सांगण्यात आले आह़े लवकरात लवकर मान्सून यावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े