शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

हवेच्या द्रोणीय भागामुळे नंदुरबारातील तापमानात घट.

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: May 24, 2018 12:57 IST

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी तापमानाचा पारा 42 अंशाच्या खाली येण्यास तयार नव्हता़ दरम्यान, समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर तयार ...

संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी तापमानाचा पारा 42 अंशाच्या खाली येण्यास तयार नव्हता़ दरम्यान, समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या हवेच्या द्रोणीय भागामुळे पुढील एक ते दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े यामुळे खान्देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आह़े  दरम्यान, या पावसाचे प्रमाण अत्यंल्प राहणार असल्याने यामुळे कुठल्याही प्रकारे शेतीचे नुकसान होणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े उत्तर-पूर्व मध्यप्रदेश ते मध्य कर्नाटकार्पयत या वा:यांचा प्रभाव असल्याने याचा परिणाम खान्देशासह, मराठवाडा व विदर्भातही जाणवत आह़े दरम्यान, या द्रोणीय वा:यांमुळे तापमानात घट झाली असली तरी हे वातावरण निवळल्यावर पुन्हा तापमान वाढीची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आह़ेबुधवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान निर्माण झाले होत़े यामुळे सकाळी काहीसे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले होत़े दुपारी दीड वाजेर्पयत ढगाळ वातावरण कायम होत़े त्यानंतर काही प्रमाणात उन्हाचा पारा जाणवू लागला़ परंतु ऐरवीसारखा चटके देणारे तापमान बुधवारी नव्हत़े त्यामुळे सतत आग ओकत असलेल्या सूर्यापासून नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळाला़ हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी समुद्रसपाटीपासून साधारणत एक किलोमीटर अंतरावर वाहत असलेल्या वा:यांचा वेध घ्यावा लागत असतो़ सध्याच्या परिस्थतीत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर अंतरावर हवेचा द्रोणीय भाग निर्माण झाला आह़े द्रोणीय भागामध्ये हवा चक्राकार किंवा गोलाकार आकाराने फिरत असत़े यात हवेचा दाब कमी असतो़ अशा वातावरणामुळे ढगाळ हवामान निर्माण होऊ शकत़े असे वातावरण 72 तास कायम राहिल्यास प्रभावीत क्षेत्रामध्ये तुरळक पावसाचीही शक्यता निर्माण होत असत़ेपश्चिमेकडून येताय वारेअरबी समुद्रावर मोठय़ा प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिमेकडून मोठय़ा प्रमाणात वेगवान वारे वाहत आहेत़ या सर्व खगोलीय परिस्थितीमुळे वातावरणात वेगवान बदल होत आहेत़ अजून काही दिवस हा कमी दाबाचा पट्टा राहिल्यास तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आह़े रात्री वा:यांच्या गतीत वाढदिवसा आग ओकणा:या सूर्यामुळे सर्वसामान्य बेहाल झाले असले तरी, रात्रीच्या वेळी मात्र साधारणात ताशी 35 ते 40 प्रतिकिमी वेगाने वारे वाहत असल्याने यामुळे नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळत आह़े रात्रीच्या वेळी प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत़ या वा:यांचा वेग नुकसान करणारा नसला तरी, मध्यरात्री काहीशी थंडी जाणवत असत़े त्यामुळे उकाडय़ापासून आराम मिळावा यासाठी नागरिक घरांच्या छतावर झोपण्यास प्राधान्य देत असतात़ यंदा केरळात वेळेत मान्सून धडकणार असला तरी अंदमानात मान्सून वारे अडकून पडल्यास पावसाळा आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ हे सर्व वेळेवर निर्माण होणा:या खगोलिय परिस्थिती अवलंबून असल्याचेही कुलाबा वेधशाळेतर्फे सांगण्यात आले आह़े लवकरात लवकर मान्सून यावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े