शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोंढरे लघुप्रकल्पाची भिंत धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लघुप्रकल्पाची पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लघुप्रकल्पाची पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत होते. मात्र लघुप्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागून भगदाड पडले आहे. येणाऱ्या पावसाळ्यात काही अघटीत झाल्यास धरण लगतच्या सात गावांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.यावर्षी समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील सर्वच धरणे, लघुप्रकल्प भरले होते. तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेला लघुप्रकल्पही भरून ओसंडून वाहत होता. मात्र लघुप्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. या भिंतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार करूनही अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. लोंढेरे गावालगत असलेले प्रकल्पाचे काम सन १९९९ ला पूर्ण झाल्यानंतर हे पाणी कुकावल, कोठली, लोंढरे या गावांच्या परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोगी पडते. या धरणातील ओसंडून पाहणारे पाणी लगतच्या चार नाल्यांमधून सोडून ते शेती उपयोगासाठी वापरण्यात येते. यावर्षी २६३ हेक्टर जमीन लघुप्रकल्पाच्या पाण्याने ओलिताखाली आली आहे त्याचा फायदा परिसरातील शेतकºयांना उत्तमरित्या झाला आहे. सुमारे १३ वर्षाअगोदर हा प्रकल्प पूर्ण भरला होता. त्यानंतर यंदा झालेल्या पावसाळयात तो प्रकल्प पूर्ण भरला होता. अतिवृष्टीमुळे १०० टक्के भरल्याने सांडव्यातून पाणी वाहून गेले. गेल्या १३ वर्षात पाणी न आल्याने प्रकल्पाच्या भिंतीला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. प्रकल्पाची परिस्थिती पाहिली असता भिंत जर अचानक तुटली तर लोंढरे जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल, कोठली या सात गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धरणातील सांडव्याच्या भिंतीची दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ, जयनगर या परिसरातील नागरिकांनी वारंवार लघुपाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून तक्रारी करूनही जनतेच्या तक्रारींना यश आले नाही.याबाबत गेल्या अनेक महिन्यापासून ग्रामस्थांनी निवेदन देऊनही लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. या प्रकल्पाच्या गळतीमुळे परीसरातील सात गावांना धोका असताना लघुपाटबंधारे विभाग निद्रीस्त अवस्थेत का आहे? असा सवाल नागरिकांनी केला आहे. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत आहे. लघुप्रकल्पाची दुरुस्ती युद्धपातळीवर संबंधित विभागाने करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात निवेदन देण्यात येईल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.