शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

रस्ता वाहून गेल्याने धोकेदायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत गेलेल्या भेंडवा नाल्याजवळ नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा भराव व ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत गेलेल्या भेंडवा नाल्याजवळ नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा भराव व रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याठिकाणी कारसारखे वाहन काढतानाही त्रास होत आहे. वारंवार मागणी करुनही याठिकाणी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे फरशीचे बांधकाम झाले नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. भराव व रस्ता वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहादा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मामाचे मोहिदे गावाच्या पूर्व दिशेकडून सोनवद, कहाटूळ, जयनगर, लोंढरे, वडाळी, फेस, बामखेडा, शिरपूर असा मार्ग जातो. बऱ्याचवेळा शहादा-शिरपूर रस्ता नादुरूस्त राहिल्यास अथवा रहदारी खोळंबली तर या मार्गाने जड वाहने ये-जा करतात. मोहिदे गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर जयनगर येथे श्री हेरंब गणेशाचे मंदिर असल्याने भाविकांची नेहमी ये-जा सुरू असते. मोहिदे गावालगत भेंडवा नाला गेला आहे. डोंगरगाव, वडछील, पुनर्वसन, उभादगड या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भेंडवा नाल्याला पाणी येते. मोहिदे गावालगत असलेल्या फरशीवरून पाणी वाहते. त्यामुळे तास-दोन तास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गेल्यावर्षी या फरशीलगत रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे मोठा बोगदा पडला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरता मातीचा भराव केला होता.मोहिदे गावाच्या पूर्वेला जय जवान जय किसान माध्यमिक शाळेच्या इमारीला लागूनच भेंडवा नाल्यास पावसाळ्यात पाणी येते. या शाळेजवळील फरशीवरुनही पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड होते. तसेच शेतमजुरांनाही शेतात कामासाठी जाण्यासाठी अडचणी येतात. मोहिदे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार देऊन व प्रत्यक्ष भेटून भेंडवा नाल्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर आल्याने या फरशीजवळील भराव व रस्ता वाहून गेला आहे. खचलेल्या रस्त्यालगत टाकलेला मुरूमही पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावरून कारसारखे वाहन काढणेही कठीण झाले आहे. अजून जोरदार पाऊस होऊन पूर आला तर उरलेला रस्ताही वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित फरशीच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे काम त्वरित युद्धपातळीवर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.