शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

स्थलांतरीत मजुरांना आणण्यासाठी दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातून मजुुरांची मोठ्या प्रमाणावर स्थलांततर झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातून मजुुरांची मोठ्या प्रमाणावर स्थलांततर झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. काहीजण अजूनही स्थलांतर करीत आहेत. स्थलांतराच्या तयारीत असणाऱ्या मतदारांना रोखण्यासाठी व स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष हजर करण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.तळोदा हा आदिवासीबहुल तालुका असून दरवर्षी रोजगाराच्या शोधासाठी तालुक्यातून शेकडो कुटूंबीय शेजारील गुजरात राज्यात स्थलांतर करीत असतात. साधारणत: दिवाळीनंतर मजुरांच्या या स्थलांतराला वेग येतो. इतर वेळी दुर्लक्षित राहणारा मजुरांचे स्थलांतर हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. कोणत्या गावातून किती मतदार स्थलांतरित झाले आहेत यांचा आढावा राजकीय पक्ष व इच्छुकांकडून घेण्यात येत आहे. मतदारांच्या स्थलांतरामुळे अनेकांची राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांचे यावर्षी झालेले स्थलांतर इच्छुकांसह राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींची चिंता वाढविणारे ठरले आहे.तालुक्यातील एका गावातून सरासरी ८० ते १०० च्या जवळपास मतदार स्थलांतर झाले असल्याचे सांगितले जाते. सर्वाधिक स्थलांतर हे तालुक्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी लागून असणाºया आदिवासीबहुल गावा मधून झाले आहे. त्यात नर्मदानगर, अमोनी, अंमलपाडा, बुधावल, प्रतापपूर, धनपूर या गणांचा समावेश आहे. या परीसरातील गावातून मोठ्या संख्येने मतदान स्थलांतर झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थलांतराच्या तयारीत असणाºया कुटुंबांची मनधरणी करून स्थलांतर रोखण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केला जात आहे. शिवाय रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानासाठी परत बोलवण्यासाठी इच्छुकांकडून मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत आहे. प्रत्यक्षात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांकडून स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी परत आणण्याचे नियोजन देखील गावपातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे. मतदानासाठी स्थलांतरित मतदारांना परत बोलवणे व स्थलांतराच्या तयारीत असणाºया कुटुंबांचे स्थलांतर रोखणे हे उमेदवारांसाठी खर्चिक ठरण्याबरोबर व उमेदवारांची दमछाक करणारे देखील आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यात उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र, 'मतदारांचे स्थलांतर' हा मुद्दा आडकाठी ठरला आहे. तळोदा तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. सर्वच गट व गणात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर रोजगारासाठी मतदारांचे झालेले हे स्थलांतर कोणाच्या पथ्यावर पडते व मतदारांच्या स्थलांतराचा फटका नेमका कोणाला बसतो हे मात्र मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.स्थलांतरीत मजुरांना परत आणण्यासाठी उमेदवारांची कसरत होणार आहे. आतापासूनच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मजुरीसाठी गेलेल्या मतदारांचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी मजुरांना आणण्याकरीता आतापासूनच नियोजन करून संबधितांना त्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मजुर ठेकेदारांनाही विनंती करण्यात येत आहे. स्थलांतर मजुरांचे मतदान मोठ्या संख्येने आहे. ते मतदान निर्णायक देखील ठरू शकते. ही बाब लक्षात घेता प्रत्येकजण त्यासाठी काळी घेत आहे.