शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजुरांना आणण्यासाठी दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातून मजुुरांची मोठ्या प्रमाणावर स्थलांततर झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातून मजुुरांची मोठ्या प्रमाणावर स्थलांततर झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. काहीजण अजूनही स्थलांतर करीत आहेत. स्थलांतराच्या तयारीत असणाऱ्या मतदारांना रोखण्यासाठी व स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष हजर करण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.तळोदा हा आदिवासीबहुल तालुका असून दरवर्षी रोजगाराच्या शोधासाठी तालुक्यातून शेकडो कुटूंबीय शेजारील गुजरात राज्यात स्थलांतर करीत असतात. साधारणत: दिवाळीनंतर मजुरांच्या या स्थलांतराला वेग येतो. इतर वेळी दुर्लक्षित राहणारा मजुरांचे स्थलांतर हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. कोणत्या गावातून किती मतदार स्थलांतरित झाले आहेत यांचा आढावा राजकीय पक्ष व इच्छुकांकडून घेण्यात येत आहे. मतदारांच्या स्थलांतरामुळे अनेकांची राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांचे यावर्षी झालेले स्थलांतर इच्छुकांसह राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींची चिंता वाढविणारे ठरले आहे.तालुक्यातील एका गावातून सरासरी ८० ते १०० च्या जवळपास मतदार स्थलांतर झाले असल्याचे सांगितले जाते. सर्वाधिक स्थलांतर हे तालुक्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी लागून असणाºया आदिवासीबहुल गावा मधून झाले आहे. त्यात नर्मदानगर, अमोनी, अंमलपाडा, बुधावल, प्रतापपूर, धनपूर या गणांचा समावेश आहे. या परीसरातील गावातून मोठ्या संख्येने मतदान स्थलांतर झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थलांतराच्या तयारीत असणाºया कुटुंबांची मनधरणी करून स्थलांतर रोखण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केला जात आहे. शिवाय रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानासाठी परत बोलवण्यासाठी इच्छुकांकडून मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत आहे. प्रत्यक्षात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांकडून स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी परत आणण्याचे नियोजन देखील गावपातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे. मतदानासाठी स्थलांतरित मतदारांना परत बोलवणे व स्थलांतराच्या तयारीत असणाºया कुटुंबांचे स्थलांतर रोखणे हे उमेदवारांसाठी खर्चिक ठरण्याबरोबर व उमेदवारांची दमछाक करणारे देखील आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यात उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र, 'मतदारांचे स्थलांतर' हा मुद्दा आडकाठी ठरला आहे. तळोदा तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. सर्वच गट व गणात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर रोजगारासाठी मतदारांचे झालेले हे स्थलांतर कोणाच्या पथ्यावर पडते व मतदारांच्या स्थलांतराचा फटका नेमका कोणाला बसतो हे मात्र मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.स्थलांतरीत मजुरांना परत आणण्यासाठी उमेदवारांची कसरत होणार आहे. आतापासूनच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मजुरीसाठी गेलेल्या मतदारांचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी मजुरांना आणण्याकरीता आतापासूनच नियोजन करून संबधितांना त्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मजुर ठेकेदारांनाही विनंती करण्यात येत आहे. स्थलांतर मजुरांचे मतदान मोठ्या संख्येने आहे. ते मतदान निर्णायक देखील ठरू शकते. ही बाब लक्षात घेता प्रत्येकजण त्यासाठी काळी घेत आहे.