शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

पाटचारीचे पाणी शेतात शिरल्याने कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन गेलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाटचारीवर अतिक्रमण केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी पुढे न जाता साचून राहत असल्याने शिरुड शिवारातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके तरारली होती. मात्र १५ दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना ताण पडू लागला होता. श्रावण महिना सुरू झाल्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.कवळीथ बंधाºयावरुन शिरुड, टेंभाकडे शहादा शहरातून लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील पाटचारी गेली आहे. या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या पाटचारीतील पाण्याचा काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना फायदा होत होता. परंतु अनेक लोकांनी या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे ठिकठिकाणी पाटचारी फुटल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पाटचारीचे खोलीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पाटचारीवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी पाटचारीवर अतिक्रमण केलेल्यांना नोटिसाही दिल्या होत्या. मात्र त्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी पाटचारीतून न वाहता ते शेतांमध्ये शिरले. शिरुड रस्त्यावर असलेल्या गिरीश पुरूषोत्तम पाटील यांच्या १६ एकरपैकी सहा एकर क्षेत्रात कापसाच्या शेतात हे पाणी शिरल्याने नुकसान झाले. रात्रभर या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शनिवारी सकाळी शेतकरी गिरीश पाटील यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरवर्षी पावसाळ्यात शेतकºयांनी ही समस्या सतावत असल्याने व पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या पाटचारीवर झालेले सर्व अतिक्रमण काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा मोकळी करावी, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.