शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाटचारीचे पाणी शेतात शिरल्याने कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन गेलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाटचारीवर अतिक्रमण केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी पुढे न जाता साचून राहत असल्याने शिरुड शिवारातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके तरारली होती. मात्र १५ दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना ताण पडू लागला होता. श्रावण महिना सुरू झाल्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.कवळीथ बंधाºयावरुन शिरुड, टेंभाकडे शहादा शहरातून लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील पाटचारी गेली आहे. या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या पाटचारीतील पाण्याचा काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना फायदा होत होता. परंतु अनेक लोकांनी या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे ठिकठिकाणी पाटचारी फुटल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पाटचारीचे खोलीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पाटचारीवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी पाटचारीवर अतिक्रमण केलेल्यांना नोटिसाही दिल्या होत्या. मात्र त्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी पाटचारीतून न वाहता ते शेतांमध्ये शिरले. शिरुड रस्त्यावर असलेल्या गिरीश पुरूषोत्तम पाटील यांच्या १६ एकरपैकी सहा एकर क्षेत्रात कापसाच्या शेतात हे पाणी शिरल्याने नुकसान झाले. रात्रभर या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शनिवारी सकाळी शेतकरी गिरीश पाटील यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरवर्षी पावसाळ्यात शेतकºयांनी ही समस्या सतावत असल्याने व पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या पाटचारीवर झालेले सर्व अतिक्रमण काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा मोकळी करावी, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.