शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

पाटचारीचे पाणी शेतात शिरल्याने कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन गेलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाटचारीवर अतिक्रमण केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी पुढे न जाता साचून राहत असल्याने शिरुड शिवारातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके तरारली होती. मात्र १५ दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना ताण पडू लागला होता. श्रावण महिना सुरू झाल्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.कवळीथ बंधाºयावरुन शिरुड, टेंभाकडे शहादा शहरातून लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील पाटचारी गेली आहे. या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या पाटचारीतील पाण्याचा काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना फायदा होत होता. परंतु अनेक लोकांनी या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे ठिकठिकाणी पाटचारी फुटल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पाटचारीचे खोलीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पाटचारीवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी पाटचारीवर अतिक्रमण केलेल्यांना नोटिसाही दिल्या होत्या. मात्र त्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी पाटचारीतून न वाहता ते शेतांमध्ये शिरले. शिरुड रस्त्यावर असलेल्या गिरीश पुरूषोत्तम पाटील यांच्या १६ एकरपैकी सहा एकर क्षेत्रात कापसाच्या शेतात हे पाणी शिरल्याने नुकसान झाले. रात्रभर या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शनिवारी सकाळी शेतकरी गिरीश पाटील यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरवर्षी पावसाळ्यात शेतकºयांनी ही समस्या सतावत असल्याने व पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या पाटचारीवर झालेले सर्व अतिक्रमण काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा मोकळी करावी, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.