शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नंदुरबारातील घाटमार्गावर होतेय ‘डॅमेज कंट्रोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 12:21 IST

जिल्ह्यातील दरडप्रणव ठिकाणे : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर होतेय कार्यवाही

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 23 : सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जिल्ह्यातील घाट रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात येत आह़े दरडप्रणव क्षेत्र तसेच ज्या मार्गावर वारंवार आपत्ती येते अशा मार्गावर उपाय योजना करून प्रशासनाकडून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ जिल्ह्यातील गावांमध्ये भूस्खलनाचा धोका नसला तरी घाटांमध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन होत असल्याने प्रशासनाकडून यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आह़ेजिल्ह्यात मोठय़ा संख्येने घाटमार्ग आहेत़ पावसाळ्यात अतिवृष्टी  झाल्याने घाटांवर भूस्खलन होऊन परिणामी मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना या आधीही जिल्ह्यात झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच पावसाळ्याच्या पाश्र्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट मार्गाची चाचपणी करून त्यावर उपाय योजना करण्यात येत आहेत़ जिल्ह्यात चार मोठे घाटमार्ग हे अत्यंत धोकेदायक आहेत़ मागील इतिहास बघता यावर दरडी कोसळण्याच्या तसेच भूस्खलन होण्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपल्या कंत्राटदारांच्या माध्यमातून उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े तसेच भूस्खलनामुळे दरड कोसळलीच तर तत्काळ ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करुन ब्लॉक झालेला रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़ेजिल्ह्यातील सोनगीर-दोंडाईचा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा-धडगाव घाट, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक आठवरील रोषमाळ-धडगाव व कोठार-तळोदा घाटमार्ग तसेच महामार्ग क्रमांक तीनवरील मोलगी-डाब-अक्कलकुवा हे चार घाटमार्ग अत्यंत धोकेदायक असल्याचा अहवाल शहादा व नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आह़े त्यामुळे संबंधित मार्गाची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़ेघाटमार्गावरील भूस्खलन रोखण्यासाठी गॅबियन पध्दतीचा वापर उपयुक्त ठरु शकतो़ या पध्दतीमध्ये घाटाच्या पायथ्या लगत चौकोनाकृती विशिष्ट प्रकारे बॉक्स ठेवण्यात येत असतात़ त्यात दगडे ठेवली जातात़ पावसाचे पाणी आल्यास ते घाटाच्या लगत ठेवलेल्या गॅबियन बॉक्समधून वाहत जात़े त्यामुळे घाटाच्या पायथ्यात पाणी ङिारपत नाही व परिणामी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या घटनांना आळा बसतो़