शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वादळ व पावसाने केळी व पपईचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात वादळ आणि पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, ...

नंदुरबार : जिल्ह्यात वादळ आणि पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. शहादा तालुक्यात केळी व पपई पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. रविवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटात आणि वादळात पावसाला सुरुवात झाली. शहादा, नंदुरबार व तळोदा तालुक्यात अधिक जोर होता. त्यामुळे पपई व केळी पिकांना त्याचा फटका बसला.

नंदुरबार बाजार समितीत असलेल्या भुईमुग शेंगा, मका, गहू उघड्यावर होता त्याला पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील केळी व पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळ व पावसामुळे मात्र वीजपुरवठा दिवसभरात वारंवार खंडित होत होता.

शहाद्यात वृक्ष उन्मळून पडले

शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अचानक आलेल्या वादळात शहरातील मुख्य रस्त्यावरील विकास हायस्कूलजवळ लिंबाचे मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. तसेच खेतिया रस्त्यावरील एका दुकानाचे पत्रे उडाले. दरम्यान, सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.

शहरात सकाळपासूनच उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळ आले. त्यात शहरातील विकास हायस्कूल व शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आवारामधून जाणाऱ्या रस्त्यावर लिंबाचा वृक्ष उन्मळून पडला. त्यात मुख्य वीजवाहिनी व उपवाहिनीच्या तारा तुटल्या. विद्यालयाचे प्राचार्य आय.डी. पाटील यांनी तत्काळ प्रसंगावधान राखून वीज वितरण कंपनीला कळविले. उपअभियंता सुजीत पाटील, भरत पाटील यांनी रस्त्यावर उन्मळून पडलेला वृक्ष आपल्या जेसीबी मशीनचा साहाय्याने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता रहदारीस खुला केला. सुदैवाने जनता कर्फ्यू असल्याने रस्त्यावर कुठलीही रहदारी नव्हती. खेतीया रस्त्यावर पत्र्याची शेड वाऱ्यामुळे कोसळली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातही वृक्ष उन्मळून पडला.

जयनगरसह परिसरातील वडाळी, कोंढावळ, बोराळे, कुकावल, कोठली, बामखेडा परिसरात जोरदार वादळाचा तडाखा बसला आहे. जयनगर येथील नितीन उत्तम माळी, विनोद संतोष माळी यांच्या शेतातील केळीबागेचे केळीच्या घडासहित झाडे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी पपई पिकाची लागवड करत होते, त्यांचेही मोठ्या प्रमाणावर रोपे उडून गेल्याने नुकसान झाले आहे.

वादळासोबत हलक्या पावसाच्या सरीही या परिसरात कोसळल्या. पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर नसला तरी वादळामुळे पिकांसह अनेक घरांचे पत्रेदेखील उडाले आहेत. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळ असलेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा बीएसएनएल जोडणीचा टॉवरदेखील जवळच्या पत्र्याच्या चावडीवर पडला आहे.

मूग पिकाचा हाताशी आलेला घास उडाला

जयनगर येथे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी केली होती, त्यांनी परिपक्व झालेले मूग शेंगासहित कापून झाडांचे छोटे-छोटे ढिगारे करून काढणीसाठी सुकवायला ठेवले होते. हे सगळे मूग जोरदार वादळाच्या तडाख्यामुळे उडाले असून त्या शेतकऱ्यांच्या शेतात एकही मुगाचे ढिगारे शिल्लक दिसत नाहीत. हातातोंडाशी आलेला घास वाऱ्यात उडाल्याने शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.