शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जामनपाडा शिवारात केळी पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, केळी, कापून ठेवलेले मुगाचे पीक व ...

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, केळी, कापून ठेवलेले मुगाचे पीक व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील जामनपाडा गावातील देसमा रत्ना गावित यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये तीन हजार ६०० केळीची रोपे लावली होती. वर्षभर मोठ्या मेहनतीने केळी पिकाची काळजी घेत खत, पाणी व्यवस्थापन करून केळी पीक फळधारणेसाठी तयार झाले होते. परंतु, चक्रीवादळामुळे जामनपाडा येथील देसमा गावित यांच्या केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. उत्पन्न निघण्याच्या आधीच वादळामुळे केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे अडीच एकर क्षेत्रावरील अर्धे केळी पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त हतबल झालेल्या शेतकऱ्याने नुकसानीबाबत महसूल व कृषी विभागाशी संपर्क साधला. परंतु, ते अद्यापही पंचनामे करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.