शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला शहाद्यात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मार्च महिन्यात बाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. यामध्ये पूर्ण कुटुंब ...

शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मार्च महिन्यात बाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. यामध्ये पूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. समूह संपर्कातून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण बाधित झाल्याचे समोर येत आहे. मागील वेळेपेक्षा यावेळेस रुग्णांचा मृत्यूदरही जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येचे प्रमाण जास्त असून, गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शहादा तालुक्यातील रुग्णवाहिकाही कमी पडत आहेत. ही भयावह परिस्थिती लक्षात घेता कोरोनाची साखळी तुटावी म्हणून जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

संचारबंदी काळात विशिष्ट वेळेत जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी बुधवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने खरेदीसाठी शहरात गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी सामाजिक अंतर न पाळणे, मास्कचा वापर न करणे असे दिसून आले. एकीकडे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना काही नागरिक मुद्दामहून शासनाने आखून दिलेले नियम तोडताना दिसून येत आहेत.

प्रशासन कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करीत असूनही काही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे प्रशासनाला दुर्दैवाने कडक निर्बंध लावावे लागत आहेत. १५ दिवसांचा लॉकडाऊन आदेश आजपासून लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी याचेही पालन केले नाही व रुग्ण संख्या वाढली तर प्रशासनाला अजून कठोर भूमिका घेत उपाययोजना कराव्या लागतील. म्हणून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले आहे.

बँकांमध्ये मोठी गर्दी

लॉकडाऊन, मार्च एंड व सलग येणाऱ्या सुट्यांमुळे बुधवारी सर्वच बँकांमध्ये खातेदारांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. १ एप्रिलपासून लॉकडाऊन असल्याने उगाच घराबाहेर निघायचे नाही या उद्देशाने अनेकांनी बँकेतील कामे बुधवारीच केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातून नागरिक आले असल्याने बँकांबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. मोठी गर्दी झाल्याने सामाजिक अंतराचा मोठा फज्जा उडाल्याचे दिसून आले.