शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

१६० दिवसात पाच हजाराचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना बाधीतांचा आकडा १६० दिवसात पाच हजार पार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना बाधीतांचा आकडा १६० दिवसात पाच हजार पार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची वाढ तब्बल तिप्पट झाली आहे. शिवाय स्थानिक ठिकाणी होणाऱ्या चाचण्या आणि चाचण्यांची वाढविलेली संख्या यामुळेदेखील रुग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याचा मृत्यूदर हा गेल्या महिनाभरापासून स्थिर झाला आहे. सद्या मृत्यूदर हा २.०३ इतका आहे. पूर्वी पाच पेक्षा अधीक होता.कोरोनाने अखेर पाच हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर दोन महिने अर्थात मे व जून महिन्यात रुग्ण संख्या मर्यादीत राहत होती. परंतु जुलै महिन्यात लॉकडाऊन शिथील झाले आणि रुग्ण संख्येने वाढीचा वेग पकडला. जून महिन्याच्या अखेर असलेली १६३ रुग्ण संख्या ही जुलै महिन्याच्या अखेरीस ५४७, आॅगस्ट महिन्याअखेर २,६०५ तर आज अखेर तब्बल पाच हजारापेक्षा अधीक गेली आहे.सर्वाधिक नंदुरबार तालुकाजिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात आढळले आहेत. सद्या तालुक्यात ३३६ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १,९५१ रुग्ण आढळले तर १,५६७ रुग्ण बरे झाले. मृत्यू देखील नंदुरबार तालुक्यातच सर्वाधिक अर्थात ४६ इतके आहेत. तालुक्यात तब्बल ७,६५१ जणांचे स्वॅब घेतले गेले आहेत.शहादा तालुक्यात सद्या २९८ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १,७०१ रुग्ण आढळून आले असून १,३६७ रुग्ण बरे झाले आहेत. ३७ जणांचा मृत्यू झाला असून ५,६४४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.तळोदा तालुक्यात ७७ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण ४९० रुग्ण आढळून आले, ३९४ रुग्ण बरे झाले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण १,५३५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. नवापूर तालुक्यात ८९ जण उपचार घेत असून ४५४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. १५ जणांचा मृत्यू झाला असून १,३७५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. ंअक्कलकुवा तालुक्यात ६१ रुग्ण उपचार घेत आहेत.१८२जण आढळून आले असून त्यापैकी १२० रुग्ण बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला तर ७७७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. धडगाव तालुक्यात सद्य स्थितीत एकही रुग्ण उपचार घेत नाही. आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले असून १३ जण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. एकुण ११३ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.मृत्यूदर झाला स्थिरजिल्ह्याचा मृत्यूदर हा २.०३ टक्केपर्यंत खाली आला आहे. पूर्वी हाच दर तब्बल पाच पेक्षा अधीक होता. कोरोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढली. परिणामी मृत्यू दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू अर्थातच नंदुरबार तालुक्यात आहेत तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.चाचण्या वाढविल्याकोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल १७ हजार ५८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सर्वाधिक चाचण्या या नंदुरबार तालुक्यात ७,६५१ इतक्या झाल्या आहेत.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दररोज किमान ५००जणांचे स्वॅब संकलन करून तेव्हढा चाचण्या कराव्या अशा सुचना दिल्या आहेत. परंतु आतापर्यंत ३०० पेक्षा अधीक चाचण्या होऊ शकल्या नाहीत ही वस्तू स्थिती आहे.