शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

१६० दिवसात पाच हजाराचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना बाधीतांचा आकडा १६० दिवसात पाच हजार पार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना बाधीतांचा आकडा १६० दिवसात पाच हजार पार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची वाढ तब्बल तिप्पट झाली आहे. शिवाय स्थानिक ठिकाणी होणाऱ्या चाचण्या आणि चाचण्यांची वाढविलेली संख्या यामुळेदेखील रुग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याचा मृत्यूदर हा गेल्या महिनाभरापासून स्थिर झाला आहे. सद्या मृत्यूदर हा २.०३ इतका आहे. पूर्वी पाच पेक्षा अधीक होता.कोरोनाने अखेर पाच हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर दोन महिने अर्थात मे व जून महिन्यात रुग्ण संख्या मर्यादीत राहत होती. परंतु जुलै महिन्यात लॉकडाऊन शिथील झाले आणि रुग्ण संख्येने वाढीचा वेग पकडला. जून महिन्याच्या अखेर असलेली १६३ रुग्ण संख्या ही जुलै महिन्याच्या अखेरीस ५४७, आॅगस्ट महिन्याअखेर २,६०५ तर आज अखेर तब्बल पाच हजारापेक्षा अधीक गेली आहे.सर्वाधिक नंदुरबार तालुकाजिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात आढळले आहेत. सद्या तालुक्यात ३३६ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १,९५१ रुग्ण आढळले तर १,५६७ रुग्ण बरे झाले. मृत्यू देखील नंदुरबार तालुक्यातच सर्वाधिक अर्थात ४६ इतके आहेत. तालुक्यात तब्बल ७,६५१ जणांचे स्वॅब घेतले गेले आहेत.शहादा तालुक्यात सद्या २९८ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १,७०१ रुग्ण आढळून आले असून १,३६७ रुग्ण बरे झाले आहेत. ३७ जणांचा मृत्यू झाला असून ५,६४४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.तळोदा तालुक्यात ७७ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण ४९० रुग्ण आढळून आले, ३९४ रुग्ण बरे झाले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण १,५३५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. नवापूर तालुक्यात ८९ जण उपचार घेत असून ४५४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. १५ जणांचा मृत्यू झाला असून १,३७५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. ंअक्कलकुवा तालुक्यात ६१ रुग्ण उपचार घेत आहेत.१८२जण आढळून आले असून त्यापैकी १२० रुग्ण बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला तर ७७७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. धडगाव तालुक्यात सद्य स्थितीत एकही रुग्ण उपचार घेत नाही. आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले असून १३ जण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. एकुण ११३ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.मृत्यूदर झाला स्थिरजिल्ह्याचा मृत्यूदर हा २.०३ टक्केपर्यंत खाली आला आहे. पूर्वी हाच दर तब्बल पाच पेक्षा अधीक होता. कोरोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढली. परिणामी मृत्यू दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू अर्थातच नंदुरबार तालुक्यात आहेत तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.चाचण्या वाढविल्याकोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल १७ हजार ५८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सर्वाधिक चाचण्या या नंदुरबार तालुक्यात ७,६५१ इतक्या झाल्या आहेत.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दररोज किमान ५००जणांचे स्वॅब संकलन करून तेव्हढा चाचण्या कराव्या अशा सुचना दिल्या आहेत. परंतु आतापर्यंत ३०० पेक्षा अधीक चाचण्या होऊ शकल्या नाहीत ही वस्तू स्थिती आहे.