वीज वितरण प्रशासनाच्या आदेशानुसार ८० टक्के वीजबिल भरणे आवश्यक असल्याशिवाय नविन रोहीत्र बसविण्यात येणार नाही, अशा शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना नुकसान सहन करावे लागत आहे, दिवाळी हंगामात वीज वितरण विभागाकडून वसुली करणे आवश्यक असून तेव्हा आपण झाेपा काढत होता का, असा जाब संघटनेच्या वतीने वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला. शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी त्वरित नविन रोहित्र मिळावे, अशी मागणी यावेळी करणयात आली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बिपीन पाटील, तालुका अध्यक्ष योगेश पाटील, यशवंत सीताराम पाटील, यशवंत सोनू पानपाटील, रमेश बारका पाटील, गोपाल श्रावण पानपाटील, वामन संतोष पाटील, बाजीराव शिवाजी पाटील, भिला गंगाराम पाटील आदी शेतकरी सहभागी होते.
२० दिवसांपासून रोहित्रामध्ये बिघाड असल्याने पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST