लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अर्ज भरण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यात २२ जून रोजी १०५ बँक शाखांतर्फे विविध गावात पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.पालकमंत्र्यांनी नंदुरबार येथे घेतलेल्या आढावा बैठकीत बँक अधिकाº्यांशी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्याविषयी चर्चा केली होती. शेतकºयांना पीक कर्ज योजनेची व अर्ज भरण्याची माहिती नसल्याने ते कर्ज घेण्यापासून वंचित रहातात. त्यामुळे मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावे व पीक कर्ज मिळविण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रीया असल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत देण्यात यावा, असे निर्देश अॅड.पाडवी यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या मेळाव्यांचे आयोजन होत आहे.पालकमंत्र्यांनी म्हटले आहे की, खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी राजा संकटाची भिती बाजूला सारून नव्या हंगामासाठी तयारीला लागला आहे. संकटावर मात करण्याची शेतकºयांची जणू परंपराच आहे. पण अशा परिस्थितीत खते, बी-बियाणे, अवजारे यासाठी त्याला आर्थिक सहकार्याची आवश्यकता असते. म्हणून शासनातर्फे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी अजूनही कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नाही. बºयाचदा माहिती नसल्याने असा लाभ घेणे शक्य होत नाही. अशी माहिती देण्यासाठी हे मेळावे होणार आहेत.गेल्यावर्षी जिल्ह्याने पीक कर्ज वाटपाचे साधारण ४० टक्के उद्दीष्ट गाठले होते. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकºयांना पीक कर्ज देऊन ८० टक्क्यापेक्षा जास्त उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि कजार्बाबत काही समस्या असल्यास तलाठी किंवा ग्रामसेवकामार्फत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅड.पाडवी यांनी केले आहे. सर्व बँक शाखांच्या अधिकारी-कर्मचाºयांनी संवेदनशिलतेने शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी आणि हा खरीप हंगाम त्यांच्यासाठी आनंददायी ठरेल असे प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.
उद्या १०५ ठिकाणी पीक कर्ज मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:05 IST