शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे़ विम्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू असून पावणेपाच कोटी रुपयांचा परतावा शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे़जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे शेतकºयांच्या कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते़ या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून पॅकेज जाहिर करण्यात आले होते़ यासोबतच नऊ हजार शेतकºयांनी पिक विमा करुन घेत उत्पादनाला संरक्षण दिले होते़ गेल्या वर्षातील नुकसानीनंतर कृषी विभागाने निश्चित केलेल्या विमा कंपनीकडून दीड हजाराच्यावर पिक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले होते़ फेब्रुवारी अखेरपर्यंत हे प्रयोग सुरूच होते़ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाल्याने पिक विमा करणाºया शेतकºयांच्या परतावा देण्यासाठी होणारे कामकाज थांबले होते़ लॉॅकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर या कामाला विमा कंपनी आणि शासनाकडून वेग देण्यात आला होता़ यांतर्गत जिल्ह्यातील ३६ मंडळातील शेतकºयांना विमा रक्कम मंजूर करण्यात येऊन वितरणाचे कामकाज सुरु झाले आहे़ ही रक्कम राष्ट्रीयकृत, खाजगी आणि जिल्हा बँकेत खाती असलेल्या शेतकºयांना प्राप्त होत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ अद्याप दोन हजाराच्या जवळपास शेतकºयांना रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती आहे़जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात जुलै अखेरपर्यंतच्या अंतिम मुदतीत २ हजार ६९४ कर्जदार तर ३ हजार ७८४ बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण सहा हजार ४८२ शेतकºयांनी एक कोटी १९ लाख ८० हजार ३२८ रुपयांचा भरणा केला होता़ यातून सात हजार ४६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते़ दरम्यान राज्य शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने तीन हजार ३१३ शेतकºयांनी पीक विमा करुन घेतला होता़ यामुळे जिल्ह्यात चार हजार ४११ कर्जदार तर पाच हजार ३८५ बिगर कर्जदार शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला होता़ एकूण नऊ हजार ७९६ शेतकºयांनी एक कोटी ६७ लाख ३८ हजार ५२० रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा केली होती़ यातून दहा हजार ३०६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ शासनाने आठ कोटी १२ लाख ५३ हजार रुपये अनुदान देत नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीकडे ३६ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केला होता़ या प्रक्रियेनंतर गेल्या वर्षभरापासून शेतकºयांना विमा परताव्याची प्रतिक्षा होती़३६ महसूली मंडळात विविध खरीप पिकांची काढणी केल्यानंतर कृषी विभागाच्या मदतीने विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने १ हजार ८३५ पीक कापणी प्रयोग केले होते़ पिकांच्या उत्पादनाची सात वर्षांची सरासरी आणि गेल्या वर्षाचे नुकसान तपासून विमा परतावा देण्यात आला आहे़४पिक विमा कंपन्यांकडून ६ हजार ३७३ शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़ यासाठी ४ कोटी ७२ लाख ४५ हजार १७६ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे़ शेतकºयांना हरभरा, कापूस, भात, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका, बाजरी, लाल हरभरा, आजवान, ज्वारी या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आला आहे़ अतीवृष्टीतील नुकसानीच्या आढाव्यानुसार ही रक्कम मंजूर करण्यत आली आहे़धडगाव तालुक्यातील खुंटामोडी मंडळात आठ, तोरणमाळ मंडळात ६१, धडगाव ४१४,नंदुरबार तालुक्यातील आष्टे मंडळात २१०, खोंडामळी मंडळात १ हजार ४१७, नंदुरबार मंडळात ९४७, धानोरा २२, कोरीट ४३, मांडळ २६, रनाळे ४३,नवापुर तालुक्यात खांडबारा मंडळात ६१, विसरवाडी १४५, नवापुर २६१, चिंचपाडा ७१, नवागाव ६२,तळोदा मंडळात १,शहादा तालुक्यातील म्हसावद मंडळात २४३, प्रकाशा मंडळा ९२४, सारंगखेडा ४२२, मोहिदा ४, शहादा १७३, कलसाडी १अक्कलकुवा मंडळात ९५, मोरंबा २, मोलगी ७, मंडळात वडफळी ३ आदी शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़नंदुरबार तालुक्यात पावसामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले असल्याने नंदुरबार, आष्टे व खोंडामळी मंडळात शेतकºयांची संख्या अधिक आहे़ त्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात आहे़