शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबुल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
3
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
4
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
5
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
6
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
7
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
8
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
9
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
10
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
11
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
12
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
13
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
14
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
15
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
16
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
17
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
18
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
19
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाच पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी पिकांचा विमा करणाºया नऊ पैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांना विमा परतावा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे़ विम्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू असून पावणेपाच कोटी रुपयांचा परतावा शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे़जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे शेतकºयांच्या कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते़ या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून पॅकेज जाहिर करण्यात आले होते़ यासोबतच नऊ हजार शेतकºयांनी पिक विमा करुन घेत उत्पादनाला संरक्षण दिले होते़ गेल्या वर्षातील नुकसानीनंतर कृषी विभागाने निश्चित केलेल्या विमा कंपनीकडून दीड हजाराच्यावर पिक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले होते़ फेब्रुवारी अखेरपर्यंत हे प्रयोग सुरूच होते़ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाल्याने पिक विमा करणाºया शेतकºयांच्या परतावा देण्यासाठी होणारे कामकाज थांबले होते़ लॉॅकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर या कामाला विमा कंपनी आणि शासनाकडून वेग देण्यात आला होता़ यांतर्गत जिल्ह्यातील ३६ मंडळातील शेतकºयांना विमा रक्कम मंजूर करण्यात येऊन वितरणाचे कामकाज सुरु झाले आहे़ ही रक्कम राष्ट्रीयकृत, खाजगी आणि जिल्हा बँकेत खाती असलेल्या शेतकºयांना प्राप्त होत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ अद्याप दोन हजाराच्या जवळपास शेतकºयांना रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती आहे़जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात जुलै अखेरपर्यंतच्या अंतिम मुदतीत २ हजार ६९४ कर्जदार तर ३ हजार ७८४ बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण सहा हजार ४८२ शेतकºयांनी एक कोटी १९ लाख ८० हजार ३२८ रुपयांचा भरणा केला होता़ यातून सात हजार ४६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते़ दरम्यान राज्य शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नव्याने तीन हजार ३१३ शेतकºयांनी पीक विमा करुन घेतला होता़ यामुळे जिल्ह्यात चार हजार ४११ कर्जदार तर पाच हजार ३८५ बिगर कर्जदार शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला होता़ एकूण नऊ हजार ७९६ शेतकºयांनी एक कोटी ६७ लाख ३८ हजार ५२० रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा केली होती़ यातून दहा हजार ३०६ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ शासनाने आठ कोटी १२ लाख ५३ हजार रुपये अनुदान देत नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीकडे ३६ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केला होता़ या प्रक्रियेनंतर गेल्या वर्षभरापासून शेतकºयांना विमा परताव्याची प्रतिक्षा होती़३६ महसूली मंडळात विविध खरीप पिकांची काढणी केल्यानंतर कृषी विभागाच्या मदतीने विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभाग यांच्या समन्वयाने १ हजार ८३५ पीक कापणी प्रयोग केले होते़ पिकांच्या उत्पादनाची सात वर्षांची सरासरी आणि गेल्या वर्षाचे नुकसान तपासून विमा परतावा देण्यात आला आहे़४पिक विमा कंपन्यांकडून ६ हजार ३७३ शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़ यासाठी ४ कोटी ७२ लाख ४५ हजार १७६ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे़ शेतकºयांना हरभरा, कापूस, भात, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका, बाजरी, लाल हरभरा, आजवान, ज्वारी या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आला आहे़ अतीवृष्टीतील नुकसानीच्या आढाव्यानुसार ही रक्कम मंजूर करण्यत आली आहे़धडगाव तालुक्यातील खुंटामोडी मंडळात आठ, तोरणमाळ मंडळात ६१, धडगाव ४१४,नंदुरबार तालुक्यातील आष्टे मंडळात २१०, खोंडामळी मंडळात १ हजार ४१७, नंदुरबार मंडळात ९४७, धानोरा २२, कोरीट ४३, मांडळ २६, रनाळे ४३,नवापुर तालुक्यात खांडबारा मंडळात ६१, विसरवाडी १४५, नवापुर २६१, चिंचपाडा ७१, नवागाव ६२,तळोदा मंडळात १,शहादा तालुक्यातील म्हसावद मंडळात २४३, प्रकाशा मंडळा ९२४, सारंगखेडा ४२२, मोहिदा ४, शहादा १७३, कलसाडी १अक्कलकुवा मंडळात ९५, मोरंबा २, मोलगी ७, मंडळात वडफळी ३ आदी शेतकºयांना विमा मंजूर करण्यात आला आहे़नंदुरबार तालुक्यात पावसामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले असल्याने नंदुरबार, आष्टे व खोंडामळी मंडळात शेतकºयांची संख्या अधिक आहे़ त्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात आहे़