शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पावसाच्या सततधारेमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबू : सलग १५ दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबू : सलग १५ दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. हंगामातील कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग, उदीड, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या १५ दिवसापासून परिसरात सर्वत्र धो-धो सरी कोसळत असल्याने शेतातील कोळपणी, निंदणी व मशागतीची कामे खोळंबली असून, पाऊस कधी थांबेल या विवंचनेत शेतकरी पडला आहे.जवळपास १२ ते १५ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे कापूस, मका, सोयाबीन, तूर ही पिके सूर्यप्रकाशाअभावी पिवळी पडून लागली आहेत. दरम्यान, मूग पिकाच्या उभ्या झाडावर असलेल्या तोडणीसाठी आलेल्या परिपक्व शेगांना अती पावसाने कोंबे फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

धो -धो बरसणाऱ्या पावसामुळे शेतातील कोळपणी, निदणीची व पिकातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. आता पाऊस कधी थांबेल या विवंचनेत शेतकरी पडला आहे. तसेच उर्वरीत येणारे सर्व नक्षत्रे ही पावसाची असून, पावसाने उघडीप दिली तरच पिकांची वाढ चांगली होते म्हणून शेतकरी मशागतीच्या कामांसाठी आता पाऊस थांबण्याची वाट पाहात आहेत.परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या कापूस या नकदी पिकावर मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अती पावसाने कापूस पिकाची पाने पिवळी व लालसर होऊन गळत आहे. काही शेतात पाणी साचल्याने कापसाची झाडे ‘मर’ रोगामुळे काढून घेण्यात येत आहे. या वेळी पिके वाचविण्यासाठी महागातल्या महाग औषधांची फवारणी करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने औषधांचा खर्चही वाया जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. पाऊस व रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संततधारेमुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. कळंबू, ता.शहादा परिसरात लागवड केलेल्या भेंडी, गवार, टमाटे, वांगी या पिकांनाही सततच्या संततधारेमुळे मोठा फटका बसत आहे. या भाजीपाल्याची वेळेत तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.