शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या ...

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना ठरणारी आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना यावर्षीही कमी होताना दिसत नाहीत. आधी बोंडअळी, दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊन, संचारबंदी आणि आता रासायनिक खतांची दरवाढ केल्याने यावर्षी शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे.

मागील दोन-तीन वर्षात अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले पाहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती कवडीही शिल्लक नाही. परिणामी गेल्यावर्षीसारखेच यावर्षी खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या दारात पीक कर्जासाठी खेटे घालावे लागत आहेत. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढ केली आहे. काही ग्रेडच्या खतांमध्ये ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट उभे राहिले आहे. या काळात खताची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बहुतांश शेतकरी पावसाळ्यापूर्वीच खतांची खरेदी करतात. मात्र यावेळी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

महागाई गगनाला

पावसाच्या लहरीपणामुळे मागील चार-पाच वर्षांपासून शेतमालाच्या उत्पादनात सातत्याने घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दरवर्षीच बिघडत आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन आले, तर मालाला भाव नाही. दुसरीकडे महागाई गगनाला भिडत असताना शेतीउपयोगी वस्तूंची दरवाढ दरवर्षी पाहावयास मिळते. एकंदरीत अतिवृष्टी, पीक कर्जासाठी बँकांच्या दारात रांगा, वाढती महागाई आणि आता खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भरच पडली आहे.

खताची दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर...

शहादा तालुक्यामध्ये चार-पाच वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि यावर्षीपासून तर कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, तसेच बाजार समितीत्याही काही काळ बंद पडल्यामुळे उत्पादित मालाची विक्री करता येत नव्हती. त्यातच भर म्हणून की काय, खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला आहे. अजूनही कृषी दुकानदारांची गेल्यावर्षीची उधारी वसूल झालेली नाही. खतांमध्ये झालेली भाववाढ ही शेतकर्‍यांच्या एकप्रकारे मुळावरच आलेली आहे. खतांची भाववाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी शहादा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.