शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या ...

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना ठरणारी आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना यावर्षीही कमी होताना दिसत नाहीत. आधी बोंडअळी, दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊन, संचारबंदी आणि आता रासायनिक खतांची दरवाढ केल्याने यावर्षी शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे.

मागील दोन-तीन वर्षात अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले पाहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती कवडीही शिल्लक नाही. परिणामी गेल्यावर्षीसारखेच यावर्षी खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या दारात पीक कर्जासाठी खेटे घालावे लागत आहेत. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढ केली आहे. काही ग्रेडच्या खतांमध्ये ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट उभे राहिले आहे. या काळात खताची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बहुतांश शेतकरी पावसाळ्यापूर्वीच खतांची खरेदी करतात. मात्र यावेळी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

महागाई गगनाला

पावसाच्या लहरीपणामुळे मागील चार-पाच वर्षांपासून शेतमालाच्या उत्पादनात सातत्याने घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दरवर्षीच बिघडत आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन आले, तर मालाला भाव नाही. दुसरीकडे महागाई गगनाला भिडत असताना शेतीउपयोगी वस्तूंची दरवाढ दरवर्षी पाहावयास मिळते. एकंदरीत अतिवृष्टी, पीक कर्जासाठी बँकांच्या दारात रांगा, वाढती महागाई आणि आता खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भरच पडली आहे.

खताची दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर...

शहादा तालुक्यामध्ये चार-पाच वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि यावर्षीपासून तर कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, तसेच बाजार समितीत्याही काही काळ बंद पडल्यामुळे उत्पादित मालाची विक्री करता येत नव्हती. त्यातच भर म्हणून की काय, खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला आहे. अजूनही कृषी दुकानदारांची गेल्यावर्षीची उधारी वसूल झालेली नाही. खतांमध्ये झालेली भाववाढ ही शेतकर्‍यांच्या एकप्रकारे मुळावरच आलेली आहे. खतांची भाववाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी शहादा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.