शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नंदुरबार पोलिस दलातर्फे ‘गुन्हेमुक्त गाव’चा उपक्रम

By मनोज शेलार | Updated: December 28, 2023 19:42 IST

गुन्हेमुक्त गाव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे.

 नंदुरबार : जिल्हा पोलिस दलातर्फे राज्यात प्रथमच ‘गुन्हेमुक्त गाव’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १४ गावांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे. त्याची सुरुवात गडद, ता. नवापूर या गावापासून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली आहे.

यात केवळ गुन्हे घडू नये हाच उद्देश नसून कायद्याची जनजागृती, अमली पदार्थ मुक्त, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह कम्युनिटी आणि सोशल पोलिसिंग यांचा समावेश राहणार आहे. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेेल्या ‘गुन्हेमुक्त गाव’ या योजनेचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली. गुन्हेमुक्त गाव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे.

बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले, भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होत असतो. गदड गाव हे नावाप्रमाणेच वृक्षांनी गडद आहे. त्यात अधिक प्रयत्न करून जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. गुन्हेमुक्त गाव मोहिमेंतर्गत गडद गावात जिल्हा पोलिस दलामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार