लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातील वाळू नंदुरबार जिल्ह्यातून वाहतुकीला मनाई असतांनाही १३ ट्रकांद्वारे त्याची वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला होता.गुजरातमधील वाळू नंदुरबारमार्गे नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची वाट तर लागलीच शिवाय अपघातही वाढले आहेत. रुग्णवाहीकेचा रस्ता वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अडवून ठेवल्याचीही संतापजनक घटना घडली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातमधील वाळू नंदुरबार जिल्ह्यातून वाहतुकीला बंदी घातली आहे. असे असतांनाही नवापूरमार्गे काही वाहने जात असल्याचे लक्षात आल्यावर ती जप्त करण्यात आली होती. त्यांच्यावर अखेर दुसºया दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले.मंडळ अधिकारी नागेश चौधरी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून जुबेर हुसेन शेख, फारूख युनूस पठाण रा.औरंगाबाद, इम्रान अहमद पठाण रा.राहता, जि.अहमदनगर, इरान अयूनखान पठाण रा.खुलताबाद, शेख इशीद सलीम कुरेशी रा.दौलताबाद, शेख मुकीन पाशा नशिम पाशा रा.बीड, शेख रऊफ शेख रेहमान रा.गारखेडा, जि.औरंगाबाद, कैसरअली लीयाकत अली रा.सिडको औरंगाबाद, गणेश प्रल्हाद नालटे रा.नाशिक, ऋषीकेश चंपालाल जाधव रा.चांदवड, नाशिक. शेख रऊफ शेख रेहमान रा.औरंगाबाद व दिपक तानाजी अहिरे रा.नाशिक यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहायक पोलीस निरिक्षक शिंपी करीत आहे.
गुजरातमधून वाळू वाहतूक प्रकरणी नवापुरात १३ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:34 IST