शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार : गावाच्या हाकेच्या अंतरावरच काळाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. दरम्यान, गावातील चारही मृतांवर सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहादा-म्हसावद रस्त्यावर आमोदा फाटय़ानजीक गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघाताच्या घटनेत तलावडीतील चार जणांना आपला जीव गमवावा लागला. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेमुळे म्हसावद पंचक्रोशी सुन्न झाली. दिवसभर याच घटनेची चर्चा परिसरात होती.तलावडी येथील 17 जण अॅपे रिक्षाने भोंगरा, ता.शहादा येथे इंदल कार्यक्रमानिमित्त बुधवारी रात्री गेले होते. त्यासाठी त्यांनी लक्कडकोट येथील रिक्षाचालक संजय रायमल रावताळे यांची रिक्षा भाडय़ाने केली होती. बुधवारी रात्री भोंगरा येथे पोहचल्यानंतर त्यांनी रात्रभर इंदल उत्सवात सहभाग घेतला. हा उत्सव अर्थात रात्रभर चालतो. पहाटे त्याचा समारोप केला जातो. पहाटे समारोप झाल्यानंतर तलावडीची सर्व मंडळी पुन्हा त्याच रिक्षाने आपल्या    गावाकडे सकाळी साडेपाच वाजता निघाली. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची रिक्षा आमोदा फाटय़ाजवळ आली असता समोरून येणा:या मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात अडकून चार जण जागीच ठार झाले होते. गाव हाकेच्या अंतरावरभोंगरा ते तलावडी हे अंतर साधारणत: 45 किलोमिटर आहे. त्यातील 42 ते 43 किलोमिटर अंतर त्यांनी सुखरूप पार पाडले. आमोदा गावापासून अर्थात अपघात स्थळापासून तलावडी अवघ्या दीड ते दोन किलोमिटर अंतरावर असतांना काळाचे अचानक घाला घातला.   घरी जाण्याची ओढ त्यांच्या     जिवावर बेतली आणि होत्याचे नव्हते झाले.गावावर शोककळागावात प्रथमच काळाचा अशा प्रकारे घाला झाला होता. प्रथमच एकाच वेळी चार जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली होती. जे जखमी झाले होते त्यांच्या चौकशीसाठी नातेवाईकांची धावपळ उडाली होती. गरीब कुटूंबातील सर्व असल्यामुळे त्यांना म्हसावद व शहादा येथे जाण्यासाठी देखील वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जखमींच्या प्रकृतीची त्यांच्या कुटूंबियांना काळजी लागली होती.यांनी केले उपचारभल्या सकाळी अपघाताची माहिती होताच आमोदा, म्हसावद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. म्हसावदचे सहायक पोलीस निरिक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. जेसीबीच्या सहायाने मालवाहू ट्रक उचलून गाडीखाली दाबलेल्यांना बाहेर काढण्यात आले. तोरणमाळ, मंदाणा, म्हसावद, शहादा येथील रुग्णवाहिकांद्वारे मयत व जखमींना तातडीने म्हसावद ग्रामिण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. म्हसावद रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक अे.आर.शेख, डॉ.प्रल्हाद पवार, डॉ.भूषण पाटील, डॉ.सोनल भावसार, डॉ.श्याम ठाकुर, डॉ.अविनाश पाटील, डॉ.राजेश पाटील, डॉ.सचिन परदेशी, डॉ.रिमान पावरा यांच्यासह गावातील डॉ.रजनीकांत सूर्यवंशी, डॉ.अरुण लांडगे, डॉ.बलराज पावरा यांनी प्राथमिक उपचार केले. शहादा रुग्णालयात डॉ.गोविंद शेल्टे व त्यांच्या सहका:यांनी शवविच्छेदन केले.आरटीओंची पहाणीअपघातस्थळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, निरिक्षक पी.एम.सैंदाणे, ओमप्रकाश यांनी दुपारी भेट देवून पहाणी केली. या मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीवर लवकरच कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिका:यांनी भेट दिली. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.