शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार : गावाच्या हाकेच्या अंतरावरच काळाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : रात्रभर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत येत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या तलावडी गावात पोहचण्याच्या आधीच पाच जणांवर काळाने अचानक घाला घातला. सकाळी-सकाळी घडलेली ही घटना तलावडी गावावर शोककळा पसरवून गेली. एकाच गावातील चौघांचा अकाली मृत्यू आणि 13 जणांना बसलेला गंभीर मार अंगावर शहारे आणणारा ठरला. दरम्यान, गावातील चारही मृतांवर सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहादा-म्हसावद रस्त्यावर आमोदा फाटय़ानजीक गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघाताच्या घटनेत तलावडीतील चार जणांना आपला जीव गमवावा लागला. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेमुळे म्हसावद पंचक्रोशी सुन्न झाली. दिवसभर याच घटनेची चर्चा परिसरात होती.तलावडी येथील 17 जण अॅपे रिक्षाने भोंगरा, ता.शहादा येथे इंदल कार्यक्रमानिमित्त बुधवारी रात्री गेले होते. त्यासाठी त्यांनी लक्कडकोट येथील रिक्षाचालक संजय रायमल रावताळे यांची रिक्षा भाडय़ाने केली होती. बुधवारी रात्री भोंगरा येथे पोहचल्यानंतर त्यांनी रात्रभर इंदल उत्सवात सहभाग घेतला. हा उत्सव अर्थात रात्रभर चालतो. पहाटे त्याचा समारोप केला जातो. पहाटे समारोप झाल्यानंतर तलावडीची सर्व मंडळी पुन्हा त्याच रिक्षाने आपल्या    गावाकडे सकाळी साडेपाच वाजता निघाली. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची रिक्षा आमोदा फाटय़ाजवळ आली असता समोरून येणा:या मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात अडकून चार जण जागीच ठार झाले होते. गाव हाकेच्या अंतरावरभोंगरा ते तलावडी हे अंतर साधारणत: 45 किलोमिटर आहे. त्यातील 42 ते 43 किलोमिटर अंतर त्यांनी सुखरूप पार पाडले. आमोदा गावापासून अर्थात अपघात स्थळापासून तलावडी अवघ्या दीड ते दोन किलोमिटर अंतरावर असतांना काळाचे अचानक घाला घातला.   घरी जाण्याची ओढ त्यांच्या     जिवावर बेतली आणि होत्याचे नव्हते झाले.गावावर शोककळागावात प्रथमच काळाचा अशा प्रकारे घाला झाला होता. प्रथमच एकाच वेळी चार जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली होती. जे जखमी झाले होते त्यांच्या चौकशीसाठी नातेवाईकांची धावपळ उडाली होती. गरीब कुटूंबातील सर्व असल्यामुळे त्यांना म्हसावद व शहादा येथे जाण्यासाठी देखील वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जखमींच्या प्रकृतीची त्यांच्या कुटूंबियांना काळजी लागली होती.यांनी केले उपचारभल्या सकाळी अपघाताची माहिती होताच आमोदा, म्हसावद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. म्हसावदचे सहायक पोलीस निरिक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. जेसीबीच्या सहायाने मालवाहू ट्रक उचलून गाडीखाली दाबलेल्यांना बाहेर काढण्यात आले. तोरणमाळ, मंदाणा, म्हसावद, शहादा येथील रुग्णवाहिकांद्वारे मयत व जखमींना तातडीने म्हसावद ग्रामिण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. म्हसावद रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक अे.आर.शेख, डॉ.प्रल्हाद पवार, डॉ.भूषण पाटील, डॉ.सोनल भावसार, डॉ.श्याम ठाकुर, डॉ.अविनाश पाटील, डॉ.राजेश पाटील, डॉ.सचिन परदेशी, डॉ.रिमान पावरा यांच्यासह गावातील डॉ.रजनीकांत सूर्यवंशी, डॉ.अरुण लांडगे, डॉ.बलराज पावरा यांनी प्राथमिक उपचार केले. शहादा रुग्णालयात डॉ.गोविंद शेल्टे व त्यांच्या सहका:यांनी शवविच्छेदन केले.आरटीओंची पहाणीअपघातस्थळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, निरिक्षक पी.एम.सैंदाणे, ओमप्रकाश यांनी दुपारी भेट देवून पहाणी केली. या मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीवर लवकरच कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिका:यांनी भेट दिली. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.