शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शुभारंभालाच कापसाला 5,868 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 11:07 IST

कापूस खरेदी : नंदुरबार बाजार समितीत सुरुवात

नंदुरबार : कापूस उत्पादक शेतक:यांच्या सोयीसाठी नंदुरबार बाजार समितीतर्फे यंदाही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या परवानाधारक व्यापा:यांकडून येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे. शुभारंभाच्या दिवशीच कापसाला येथे जास्तीत जास्त 5,868 रुपये भाव मिळाला. यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.नंदुरबार बाजार समितीतर्फे दरवर्षी पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात परिसरातील शेतक:यांचा कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी परवानाधारक शेतक:यांसह सीसीआयतर्फे देखील खरेदी होते. यंदा मात्र, सीसीआयची खरेदी लांबली आहे. त्यामुळे परवानाधारक शेतक:यांनीच या ठिकाणी खरेदीला सुरुवात केली आहे. सोमवारी खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. बाजार समितीचे सभापती देवमन पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, संचालक डॉ.सयाजी मोरे, राजाराम पाटील, हिरालाल पाटील, आनंदराव कदमबांडे, संभाजी वसावे, बापू पाटील, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.दरम्यान, यंदा शुभारंभालाच चांगला भाव मिळाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पहिल्या दिवशी एकुण 12 वाहनांमधून 200 क्विंटल कापूस आवक झाली. प्रतवारीनुसार कमीतकमी 5,550 रुपये ते 5,868 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यापुढेही भाव वाढण्याची शक्यता कायम आहे. यावेळी बोलतांना देवमन पवार यांनी सांगितले, बाजार समितीत कापूस विक्री केल्यास शासनाने बोनस किंवा इतर तत्सम निर्णय घेतल्यास ते शेतक:यांना मिळू शकेल. खाजगी व्याप:यांकडे किंवा खेडा खरेदीत कापूस विक्री केल्यास या लाभापासून शेतक:यांना वंचीत राहावे लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक:यांनी बाजार समितीतच कापूस विक्री करावा. चांगल्या प्रतिच्या कापसाला चांगला भाव मिळणार आहे. शेतक:यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असेही आवाहन पवार यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात सचिव योगेश अमृतकर यांनी खरेदी केंद्रासंदर्भात माहिती दिली.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 500 ते हजार रुपये जास्त भाव आहे.