शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

शेतकऱ्यांची प्रथम पसंती कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षभराच्या अर्थकारणाला वेग देणाऱ्या कापूस पिकाला शेतकरी यंदाही प्रथम प्राधान्य देत असून तुरळक पावसाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षभराच्या अर्थकारणाला वेग देणाऱ्या कापूस पिकाला शेतकरी यंदाही प्रथम प्राधान्य देत असून तुरळक पावसाच्या बळावर जिल्ह्यात १ लाख हेक्टरपर्यंत लागवड पूर्ण झाली आहे़ निर्धारित क्षेत्राच्या ९२ टक्के कापूस लागवड जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्याने यंदाही कापूस सव्वा लाख हेक्टरवर दिसून येण्याची शक्यता आहे़प्रामुख्याने पावसावर आधारीत शेती करणाºया नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाने नेहमीच बळ दिले आहे़ बºयाचवेळा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनापासून मुकले असले तरीही जिल्ह्यात दरवर्षी कापसाची वार्षिक लागवड ही एक लाख हेक्टरच्या पुढेच राहिली आहे़ २०१५ पासून आढावा घेतल्यास हेक्टरी सरासरी किमान २०३ किलो कापूस उत्पादन शेतकºयांना आले आहे़ यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ५ हजार हेक्टरवर कापूस लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला होता़ पावसावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील शेतीत सप्टेंबर मध्यापर्यंत शेतकरी पेरण्या करत असल्याने एक लाखाचा टप्पा हा तेव्हाच पूर्ण होईल अशी शक्यता होती़ परंतु पावसाने जूनमध्ये दिलेल्या हजेरीच्या बळावर शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला आहे़ धान्य, कडधान्य आणि इतर गळीत तेलबिया पिकांची पेरणीही वेगात सुरू आहे़जिल्ह्यात मंगळवारअखेरपर्यंत १ लाख ५ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रापैकी ९७ हजार ७०७ हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण करण्यात आली आहे़ एकूण ९२ टक्के कापूस लागवड पूर्ण झाली आहे़नंदुरबार तालुक्यात ३३ हजार २५२, नवापूर ७ हजार ६४२, शहादा ४१ हजार ६५९, तळोदा ८ हजार २१७, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ५ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे़जिल्ह्यात एकूण २ लाख ११ हजार ४५७ हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ यात नंदुरबर ४५ हजार २२३, नवापूर ४७ हजार २९३, शहादा ५४ हजार २०६, तळोदा १३ हजार ३९५, धडगाव १९ हजार ४४३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३१ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़कापसाखालोखाल २५ हजार ८३४ हेक्टरवर ज्वारी तर १७ हजार ५३७ हेक्टरवर सोयाबीन पेरणी पूर्ण करण्यात आली आहे़जिल्ह्यात ७१ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़