शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

घरकुल वाटप प्रक्रिया पुन्हा रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:48 IST

876 घरे बांधून तयार : आता पुन्हा नव्याने अर्ज भरून घेणार, लाभार्थी निवडीचा प्रश्न

ठळक मुद्दे अल्प व मध्यम उत्पन्न गटांना घरे.. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता मध्यम उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबांना घरे बांधून मिळणार आहेत. त्यासाठी यापूर्वीच पालिकेने संबधित कुटूंबांचे सव्र्हेक्षण करून त्यांच्याकडून अजर्ही भरून घेतले

ऑनलाईन लोकमतदिनांक 29 ऑगस्टनंदुरबार : नंदुरबारातील घरकुलांचा तिढा सुटण्याच्या मार्गावर नसल्याचे चित्र आहे. तयार असलेल्या 876 घरकुलांसाठी आता लाभाथ्र्याना नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी घरकुल वाटप होणे शक्य नसल्याचे एकुण चित्र आहे. नंदुरबारातील 3340 झोपडपट्टी धारकांपैकी पात्र लाभाथ्र्यासाठी पालिकेच्या प्रस्तावावरून शासनाने आठ वर्षापूर्वी 1176 घरकुलांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 876 घरकुले बांधकामास परवाणगी मिळाली होती. ही बाब लक्षात घेता पालिकेने त्यासाठी भोणे फाटय़ाजवळील जागा आणि शासकीय रुग्णालयासमोरील जागा या घरकुलांसाठी मंजुर केली होती. या दोन्ही ठिकाणी अपार्टमेंटच्या धर्तीवर घरकुलांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. परंतु लाभार्थी निवड आणि इतर बाबींमुळे त्याचे वाटप रखडले आहे. हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतांना आता पुन्हा पालिकेने नव्याने प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्ीकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे किमान सहा महिने तरी घरकुलांचे वाटप रखडणार हे जवळपास स्पष्ट आहे. पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपास धारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतू फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा:या कुटूंबाचे घर किंवा झोपडी ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती, तरच घरकुलाचा ताबा मिळणार होता. जुनी घरे किंवा झोपडी या  शहराच्या लगत किंवा शहरात आणि लोकवस्तीत असल्यामुळे शिवाय वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहण्याची सवय झाल्याने जुने घर किंवा झोपडी सोडण्यास कुणी सहसा तयार होत नाही. याशिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून 10 ते 12 हजार रुपये देखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि ही प्रक्रिया रखडली.दुसरीकडे बेघर संघर्ष समितीतर्फे जी यादी देण्यात आली आहे त्याच यादीतील लाभार्थ्ीची निवड करावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. ती यादी मंजुर होत नसल्याचे पाहुन अर्धवट बांधकाम असलेल्या घरकुलांमध्ये संबधितांनी ताबा देखील मिळविला होता. तब्बल आठ ते दहा महिने हा ताबा घेत संबधितांनी घरकुल सोडले नव्हते. अखेर पोलिसांचा हस्तक्षेप आणि जिल्हाधिका:यांच्या मध्यस्थीने ही घरकुले खाली करण्यात आली. त्यानंतर उर्वरित बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. आता ही घरकुले वाटपासाठी पुर्णपणे तयार असून त्यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबविणे तेवढे बाकी आहे.पुन्हा नव्याने सुरुवातलाभार्थी निवड प्रक्रियेची आता पुन्हा नव्याने सुरूवात करण्यात येत आहे. लाभार्थी आपले जुन्या घराची जागा पालिकेला देण्यास तयार नसल्यामुळे मागे राबविण्यात आलेली सर्वच प्रक्रिया रद्दबातल ठरवून नव्याने अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. त्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागात 25 रुपये भरून अर्ज मिळणार आहेत. अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपुर्णपणे भरून देण्याची मुदत 18 सप्टेंबर आहे.