शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कोरोनामुक्तीची गाडी सुसाट ; आली जरी लाट तरी फिकर नाॅट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर हा ९७ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटल्याने ही स्थिती असून प्रामुख्याने ऑक्सिजनची ...

नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर हा ९७ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटल्याने ही स्थिती असून प्रामुख्याने ऑक्सिजनची गरज असलेले बाधित रुग्णच घटल्याने जिल्ह्यातून ‘कोरोना पळाला’ अशी स्थिती आहे. यातही तिसरी लाट आलीच तर आरोग्य विभाग सोयीसुविधांनी सज्ज असून चिंता करण्याची गरज नसल्याचा दावा केला जात आहे.

मार्च ते मे या काळात जिल्ह्यात कोरोनाचे १९ हजार ९८६ रुग्ण आढळून आले होते. त्यातून १९ हजार ३२४ जण कोरोनामुक्तही या काळात झाले आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक १६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट वाढला होता. परंतू सातत्याने वाढत गेलेले बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि उपचारपद्धतीमुळे जिल्ह्यातील कोरोना ९९ टक्के नियंत्रणात आल्याचे आजच्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्येवरुन समोर आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर हा ९७.३ टक्के झाला आहे.

साडेसहा हजार बेड

जिल्हा रुग्णालयात २५८, कोविड हाॅस्पिटलमध्ये १६१, कोविड केअर सेंटरमध्ये ८८९, रेल्वे रुग्णालयात ३७८ तर ग्रामीण भागात ५ हजार असे एकूण ६ हजार ७१३ बेड सध्या तयार आहेत.

रुग्णसेवेसाठी ३०० पेक्षा अधिक वर्ग एक व वर्ग दोनचे वैद्यकीय अधिकारी तैनात आहेत.

यातून जिल्हा रुग्णालयात सध्या एकूण ९ रुग्ण उपचार घेत असून ३०० ऑक्सिजन बेडपैकी केवळ चार बेडवर रुग्ण आहे. या रुग्णांची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याने लवकरच ते घरी परत जाणार आहेत.

जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊन ऑक्सिजनची गरज भासण्याच्या रुग्णांच्या तक्रारी ह्या ९९ टक्के नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सध्यातरी रुग्ण हे ऑक्सिजन मास्कविनाच उपचार घेत असल्याचे येथील दिलासादायक चित्र आहे.

६४० ओटू बेड

दीड वर्षांपूर्वी ४० च्या जवळपास असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या आता ६४० एवढी आहे.

नंदुरबार ३५०, नवापूर व धडगाव येथे प्रत्येकी ९०, शहादा व तळोदा येथे प्रत्येकी ५० तर अक्ककुवा येथे ६० ऑक्सिजन बेड सध्या सज्ज आहेत.

सोबतच ११२ व्हेंटिलेटर्स सुसज्ज केले गेले आहेत.

ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटरही लावले : सर्व सहा तालुक्यांतील रुग्णांलयांकडे एकूण ४८६ ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर लावण्यात आले असून १८६ ऑक्सिजन बायपॅप काॅन्सेंट्रेटरही सोबतीला देण्यात आले आहेत. यातून एखादा गंभीर रुग्ण दाखल झाल्यास त्याला तातडीने ऑक्सिजन देणे शक्य आहे.

पालकांनो घाबरू नका, लाट आली तरी...

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही येणार किंवा कसे याबाबत तज्ज्ञांमध्येही मत-मतांतरे आहेत तरीही राज्य शासनाने दक्षता म्हणून बालरोगतज्ज्ञांना बालकांवर कशाप्रकारे उपचार करता येतील याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्णही झाले आहे.

संभाव्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाकडून आठ बालरोग तज्ञ नियुक्त केले आहेत. धडगाव व अक्कलकुवा येथे प्रत्येकी एक, नंदुरबार चार तर नवापूर येथे दोन असे आठ तज्ज्ञ सज्ज आहेत. तळोदा व शहादा येथे बालरोगतज्ज्ञ दिले जाणार आहेत.

लहान बालकांना संसर्ग झालाच तर त्यांना स्वतंत्र अशी सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी ८८० बेड विना ऑक्सिजन तर ६४० ऑक्सिजन तर ११२ व्हेंटिलेटर्स आहेत. अक्कलकुवा येथे ६०, धडगाव ९०, शहादा ८०, तळोदा ५०, नवापूर ११० तर नंदुरबार येथे सर्वाधिक ४९० बेड हे लहान बालकांसाठी सज्ज करण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले गेले आहेत.

दुर्घटना टाळण्यासाठी स्ट्रक्चरल व फायर ऑडिट

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक येथे ऑक्सिजन गळती होऊन जीवितहानी झाली होती. यापासून धडा घेत जिल्ह्यातील १३ शासकीय व २३ खासगी रुग्णालयांचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींनुसार दुरुस्त्याही पूर्ण झाल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने ऑक्सिजन तुटवडा भासू नये यासाठी २० मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी १० ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित असून यासाठी ४ कोटी ७३ लाख रूपयांचा खर्चही मंजूर करण्यात आला आहे. या खर्चातून ८.११ मेट्रीक टन ऑक्सिजननिर्मिती शक्य होणार आहे.

जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या स्थितीत आला असला तरीही प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देत आगामी काळाचे नियाेजन सुरू ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन बेडपैकी केवळ चार बेडवर रुग्ण आहेत. हे रुग्णही बरे होण्याच्या स्थितीत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका हा संभाव्य आहे. आरोग्य विभागाने तयारी पूर्ण करून ठेवली आहे. जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुसज्ज करून ठेवल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य त्या तपासण्या करून योग्यवेळी उपचार घेतल्यास धोका टळेल.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,