शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

कोरोना लसीकरण आणि तिसरी लाट ठरविणार शाळा कधी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

नंदुरबार : लसीकरण वेग घेत नसल्यामुळे आणि जिल्ह्यासह राज्यातही कोरोना कमी होत नसल्याने यंदाही जून महिन्यात शाळांची घंटा वाजणार ...

नंदुरबार : लसीकरण वेग घेत नसल्यामुळे आणि जिल्ह्यासह राज्यातही कोरोना कमी होत नसल्याने यंदाही जून महिन्यात शाळांची घंटा वाजणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात विशेष म्हणजे शाळेत पहिले पाऊल ठेवणारे पहिलीचे ३० हजार विद्यार्थी शाळेत न येताच थेट दुसरीत जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रगतीविषयी पालकांसह शिक्षकांनाही चिंता लागून आहे.

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाची गती जेमतेमच आहे. ग्रामिण व आदिवासी दुर्गम भागात तर अद्यापही भीती व गैरसमज कायम आहेत. त्यामुळे लसीकरण वाढत नसल्याची स्थिती आहे. लसीकरणाची गती वाढणार नाही तोपर्यंत शाळादेखील सुरू होणार की नाही हा प्रश्न आहे. कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तर चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्गम तसेच ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधेचा अभावामुळे ऑनलाइन शिक्षणाचा काहीही फायदा विद्यार्थ्यांना होत नसल्याची स्थिती होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्यात आल्या. नववी ते बारावीच्या शाळा किमान चार महिने सुरू राहिल्या, पाचवी ते आठवीच्या शाळा दोन महिने तर पहिली ते चौथीच्या शाळा जेमतेम महिनाभर सुरू राहिल्या. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षांचे नियोजन सुरू असतांना मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

शाळा बंद झाल्याने चाचणी परीक्षा, वार्षिक परीक्षा देखील झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठविण्यात आले आहे. नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही शाळांनी किमान युनिट टेस्ट घेऊन त्यानुसार मूल्यमापन करून निकाल तरी दिला. परंतु प्राथमिक शाळा तसेच काही माध्यमिक शाळांनी ते देखील केले नाही.

सर्वाधिक नुकसान शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे झाले. एकही दिवस शाळेत न जाता त्यांना थेट दुसरीत प्रवेश मिळाला आहे. तीच स्थिती माध्यमिक शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची देखील झाली आहे. त्यांनाही सरसकट सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील शैक्षणिक कालावधीत त्यांना त्याचा फटका बसणार आहे.

३० हजार विद्यार्थी जाणार थेट दुसरीत

n गेल्या वर्षी पहिलीत जवळपास ३० हजार विद्यार्थी प्रवेशित होते. त्या सर्वांना शाळेची पायरीही न चढता थेट दुसरीत प्रवेश मिळेल.

n खासगी व इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी किमान ऑनलाइन क्लास घेऊन विद्यार्थ्यांना किमान शिक्षणाचे प्राथमिक ज्ञान तरी दिले. परंतु बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थिती अगदीच वाईट होती.

n यामुळे हे विद्यार्थी वाचन, लेखनमध्ये आगामी काळात काय प्रगती करतील याकडे लक्ष लागून आहे.