शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पाच दिवसांत 54 जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या मात्र वाढत चालली आहे. गेल्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या मात्र वाढत चालली आहे. गेल्या पाच दिवसांत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यूंमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. झालेले मृत्यू हे ४० ते ७० वयोगटातील आहेत. आतापर्यंत ६७४ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात झाले आहेत. तर सर्वात कमी मृत्यू धडगाव तालुक्यात झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आकडा दैनंदिन ८० ते ३०० च्या घरात येत आहे. यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. गेल्या पाच दिवसांत तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पाच दिवसांत ५० पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मृत्यूदर वाढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या मृत्यूंमुळे मृत्यूदर वाढण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्यात सध्या तरी मृत्यूदर कमी दिसत आहे; परंतु आता कोरोना रुग्णसंख्य कमी झाली असून मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे येत्या काळात मृत्यूदर वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एकूण ६७४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या अशीच राहिली तर येत्या काळात मृत्यूदर तीन टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

अक्कलकुवा, धडगावपेक्षा जिल्हाबाहेरील मृत्यू अधिक

जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात झाले आहेत. एकूण ३०५ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल १७५ जणांचा शहादा तालुक्यात मृत्यू झाला आहे. नवापूर तालुक्यात ९५ जणांचा, तळोदा तालुक्यात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यापेक्षा जिल्ह्याबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही तब्बल ६४ आहे तर अक्कलकुवा तालुक्यात केवळ १६ व धडगाव तालुक्यात केवळ १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाच दिवसांत मृत्यूसत्र

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५ एप्रिल रोजी १३, ६ एप्रिल रोजी ११, ७ एप्रिल रोजी १३, ८ एप्रिल रोजी सात तर ९ एप्रिल रोजी १० जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात देखील मृत्यूसंख्या याच पटीने येत होती. त्यावेळी एका दिवसात सर्वाधिक १९ मृत्यू झाले आहेत. त्यावेळी कोरोनाचा कहर जिल्ह्यात वाढला होता. शिवाय रुग्णांना बेड न मिळणे, परजिल्ह्यात, परराज्यात उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे मृत्यू संख्या वाढली होती. आताच्या स्थितीत कोरोना नियंत्रणात असताना देखील मृत्यूसंख्या कमी होत नसल्याचे दिसून येत असल्याने आरोग्य विभागातर्फे कारणमीमांसा करणे आवश्यक आहे.

वयोगट स्थिर

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा वयोगट हा ४० ते ७० दरम्यानचा आहे. गेल्या वर्षी अर्थात पहिल्या लाटेवेळी मृत्यूचा वयोगट हा किमान ५५ ते त्यापुढे होता. आता ४० पर्यंत खाली आला आहे.

जिल्ह्याबाहेर मृत्यू अधिक

मृत्यूची आकडेवारी केवळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची असते. जिल्ह्याबाहेर तसेच गुजरातमध्ये उपचार घेताना मृत्यू झाल्यांची आकडेवारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ती संख्यादेखील अधिक आहे. परिणामी, रेकॅार्डवरील संख्या व प्रत्यक्षातील संख्या यात मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती नंदुरबारातील अमरधाममध्ये होणारे अंत्यसंस्कार व प्रत्यक्षातील शासकीय आकडा यातही मोठी तफावत राहत आहे.