शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

तळोद्यातील बैल बाजाराला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बाजार समित्यांना पशुधन खरेदी-विक्रीसाठी परवानगी दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बाजार समित्यांना पशुधन खरेदी-विक्रीसाठी परवानगी दिली असली तरी तळोदा येथील शुक्रवारच्या बैलबाजारात एकही बैल विक्रीसाठी आला नव्हता. काही शेतकरी तपास करून निघून गेले होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बाहेरील व्यापाऱ्यांच्या गाड्या अडविल्या जावून नाहक त्रास दिला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच बैल बाजारालाही फटका बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रशासनानेच ठोस भूमिका घेण्याची शेतकºयांची मागणी आहे.कोरोना या वैश्विक महामारीचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वच प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी गेल्या मार्च महिन्यांपासून बाजार समित्यांमधील बैलबाजारदेखील बंद करण्यात आला होता. तथापि शेतकºयांच्या खरीप हंगामाला येत्या जून महिन्यांपासून सुरूवात होत आहे. साहजिकच त्यांना मशागतीच्या कामांना बैलजोडीची आवश्यकता भासण्याची शक्यता लक्षात घेऊन पणन महासंघाने बाजार समित्यांमधील भरणाºया बैल बाजाराच्या खरेदी-विक्रीस नियमांचे पालन करून शिथिलता द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेदेखील पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बाजार समित्यांना शासनाच्या नियमांचे पालन करून बैलबाजार भरण्याची परवानगी एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.तळोदा बाजार समितीच्या प्रशासनानेदेखील प्रशासनाची परवानगी मिळाल्याबरोबर शुक्रवारच्या बैलबाजारासाठी आपल्या पटांगणावर सोशल डिस्टन्सिंगची आखणी करून सुसज्ज अशी तयारी केली होती. तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर बैल बाजार भरणार असल्यामुळे बैलांचीही चांगली आवक होईल, अशी आशा बाजार समितीच्या प्रशासनाबरोबरच शेतकºयांना होती. परंतु त्या दिवशी एकही बैल विक्रीसाठी आला नाही. बाजार समितीची निराशा झाली. प्रशासनाने जिल्हाबाहेरील अनेक व्यापाºयांना भ्रमणध्वनीने संपर्क केला होता. मात्र बैल बाजारात विक्रीसाठी ज्या वाहनातून बैल आणतो तेव्हा रस्त्यात पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असतो. त्यामुळेच बाजारात बैले विक्रीसाठी आणू शकलो नाही, अशी निराशाजनक प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली.तळोदा बाजार समितीतील आठवडे बैल बाजारात बाहेर जिल्ह्यातील व्यापारीच अधिक आपले पशुधन आणत असतो. वास्तविक जिल्ह्यातील स्थानिक हातदोरवाले व्यापाºयांनीही बैल आणले नाहीत. कोरोनाची भिती अजूनही या व्यावसायिकांमधून गेलेली नाही. याबाबत बाजार समितीने त्यांच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे. शेतकºयांच्या खरीप हंगामाला सुरूवात होण्यास काही दिवसांचाअवधी आहे. त्याचातच बैल बाजारात बैलांची आवक येत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण शुक्रवारच्या बाजारात बैलच न आल्यामुळे शेतकºयांना निराश होऊन परत जावे लागले. या जिल्हा प्रशासनाने व्यावसायिकांच्या बैल वाहतुकीसाठी संबंधीतांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी शेतकºयांची मागणी आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार बंद होता. प्रशासनाने पुन्हा बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शुक्रवारच्या बैल बाजारासाठी आम्ही शासनाच्या नियमांच्या पालनानुसार सुसज्ज तयारी केली होती. मात्र एकही बैल विक्रीसाठी आला नाही. व्यावसायिकांशी संपर्कदेखील केला होता. तरीही पुढील बाजारासाठी अधिक बैलांची आवक येण्याकरीता प्रयत्न करणार आहोत.-सुभाष मराठे,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, तळोदा