शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अक्कलकुव्यात शासकीय कार्यालयाचे दरवाजे ‘सामान्यांना बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरवाजांऐवजी प्रशासनाने सुरु केलेली एकखिडकी योजना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरत असली तरी अडगळीत असलेल्या खिडकीला लोंबकणारे नागरिक मात्र यामुळे त्रस्त झाले आहेत़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने शासकीय कार्यालयांचे कामकाज बंद होते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्व कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची १०० टक्के उपस्थिती देऊन कामकाज सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार शहरात कार्यालये सुरु झाली असून तुरळक स्वरुपात नागरीक येऊ लागले आहेत़ शहरातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातही नागरिकांची ये-जा सुरु झाली आहे़ परंतु इतर कार्यालयांच्या तुलनेत येथील अधिकाºयांनी कोरोनामुक्तीचा अजब फंडा शोधून काढत बाहेरुन येणाºया कोणत्याही नागरिकाला प्रवेशच देऊ नये असे आदेश काढले आहेत़ यातून मग शेती संबधित दस्त, गाव नकाशे, ले-आऊट, बांधकाम परवानगी संबधी कागदपत्रांची पूर्तता यासह विविध कामांसाठी येणाºया नागरिकांना खिडकीतून आपले म्हणणे मांडून तेथून कागदपत्रे देण्याचा निर्णय घेतला़ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य असलेल्या निर्णयात मात्र सुविधा निर्माण करण्याचा अधिकारी आणि कर्मचाºयांना विसर पडला आहे़ येणारे नागरिक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बोळीतून भिंतीला लटकून खिडकीला लोंबकळत आपले मांडत असल्याचे चित्र याठिकाणी दरदिवशी दिसून येत आहे़ या बोळीत गवत, कचरा, घाण साचून आहे़ यात सापांची भिती असतानाही नागरिक नाईलाजाने खिडकीला लटकून म्हणणे मांडत आहेत़शहरातील इतर शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी मास्क, सॅनेटायझरचा वापर करुन येणाºयांसोबत संवाद करत असताना भूमी अभिलेख कार्यालयातील या प्रकारामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ हा आदेश नेमका कोणी काढला, याबाबत अधिकारी व कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत़ कार्यालयात कोणी येऊ नये म्हणून सकाळ ते सायंकाळ दोन शिपाई वर्गीय कर्मचारी दारात थांबवून ठेवण्यात येतात़ केवळ याच कार्यालयात सुरु असलेल्या या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे़