लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संसर्ग होवू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला लिलाव आणि खरेदीचे व्यवहार पहाटे घेण्याचा निर्णय घेतला आहे़ यानुसार गेल्या महिनाभरापासून कामकाज सुरु करण्यात आले आहे़ परंतू ही वेळ शेतकऱ्यांना अडचणीची ठरत असून आगामी काळात प्रशासनाने ही वेळ बदलून पुन्हा दुपारुन बाजार सुरु करण्याची मागणी होत आहे़नंदुरबारातील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार अनेक वर्षांपासून सुरु आहेत़ परंतू मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर हा बाजार बंद होता़ जीवनावश्यक वस्तूत समावेश असल्याने याठिकाणी भाजीपाला पुरवठा सुरु करण्यात आला होता़ यामुळे बाजार काही अंशी पूर्ववत सुरु झाला़ परंतू शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी यांना कोरोना संसर्ग होवू नये यासाठी बाजार रात्री भरवण्यास सुरुवात झाली आहे़ आधीच परजिल्ह्यातून भाजीपाला आवक बंद असताना रात्री सुरु झालेल्या मार्केटमुळे स्थानिक शेतकऱ्यांकडून पुरवठा होणारा भाजीपाला कमी असल्याने व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना अडचणी येत आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने हे भाजीपाला मार्केट रात्री सुरु करण्यात आले आहे़ यामुळे प्रशासनाने लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा आहे़नंदुरबार बाजार समितीत लॉकडाऊनपूर्वी प्रामुख्याने साक्री व नाशिक जिल्ह्याच्या काही भागातून हिरवा भाजीपाला नियमित विक्रीसाठी येत होता़ लॉकडाऊनमुळे हा भाजीपाला बंद झाला आहे़ नंदुरबार तालुक्याच्या गावांमधून भाजीपाला आवक सध्या सुरु असली तरी एवढ्या रात्री नंदुरबारपर्यंत पोहोचणे शेतकºयांना शक्य नसल्याने शेतकरी दुपारी किंवा सायंकाळी भाजीपाला आणून बाजार समितीत ठेवत आहेत़ यातून माल खराब होण्याची अधिक भिती आहे़ शेतात सायंकाळी मजूर मिळून भाजीपाला काढणेही शक्य होत नाही़
कोरोनामुळे भाजीपाला खरेदीचे व्यवहार पहाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:40 IST