शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचे चाकही पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने ...

नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने खासगी प्रवासी बसेस अर्थात ट्रॅव्हल्सचा मोठा वापर होतो, परंतु कोरोनामुळे नागरिकांचा प्रवास कमी झाला असल्याने जिल्ह्यातून धावणाऱ्या खासगी बसेस चालक-मालक व बुकिंग घेणाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.

नंदुरबार शहर ते पुणे, मुंबई, अहमदाबाद व सूरत या मार्गावर साधारण ४५ बसेस कोरोनापूर्वी चालविण्यात येत होत्या. आलिशान व्यवस्थेमुळे सामान्य प्रवासीही दोन पैसे खर्च करून यातून प्रवास करत होते, परंतु काेरोनामुळे हा प्रवास तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबला होता. नोव्हेंबर, २०२० पासून काही अंशी प्रवाशांची संख्या वाढत होती. यातून आलबेल सुरू असतानाच, गेल्या १५ दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची संख्या ही निम्म्यावर आली आहे. परिणामी, जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेसची संख्या ही निम्म्यावर आली असल्याची माहिती नंदुरबार शहरात ट्रॅव्हल्स बुकिंग घेणाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

गाडी रुळावर आल्यानंतर पुन्हा समस्या...

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर पुणे व मुंबई येथून शहरात येणाऱ्या व येथून पुन्हा जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या वाढली होती. प्रवाशांचे बुकिंग मिळू लागल्याने व्यावसायिकांचे मागील नुकसान भरून येण्यास सुरुवात होत होती. यात डिसेंबरपासून लग्नसराई सुरू झाल्याने व्यवसायामध्ये तेजी होती, परंतू जानेवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू झाली. यातून फेब्रुवारी मध्यापासून या व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. १ मार्चनंतर पुणे व मुंबई येथून येणाऱ्या काही गाड्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याची माहिती चालकांकडून देण्यात आली आहे.

चालक आणि वाहकांसह बुकिंग घेणारे अडचणीत

नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स या धुळे किंवा नाशिक येथील टूर्स कंपन्यांच्या आहेत. या ट्रॅव्हल्स चालक व मालकांकडून नंदुरबारात काहींना ऑनलाइन बुकिंग घेण्याचे अधिकार दिले आहेत. यातून कमिशन बेसिसवर काही होतकरू युवक दिवसभरात प्रवाशांच्या नोंदण्या करून सेवा देतात. या ट्रॅव्हल्सवरच शहरातील काही जण चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून या ट्रॅव्हल्सवर सेवा दिली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी झाल्याने बुकिंग घेणारे व चालक यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. दर दिवशी १० टक्के प्रवासी संख्या घटत असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार हे चालक आणि बुकिंग घेणारे बसेसमध्ये सर्व सोयी करून देत आहेत. यात प्रामुख्याने मास्कवाटप, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी पाणी व साबणही देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

होळीसाठी दरवर्षी पुणे येथून मोठ्या संख्येने नोकरदार येतात. सोबत मुंबई परिरसरातून अनेक जण येतात. परंतु होळी साधेपणाने साजरी होत असल्याने हे नागरिक येण्याची शक्यता मावळली आहे. दुसरीकडे लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे बाहेरगावी लग्नाला येणारे प्रवासी कमी आहेत. कोरोना वाढतोय, यामुळे अनेक जण कोणत्याही वाहनातून प्रवास करणे टाळत आहेत.

- तुकाराम चित्ते, ट्रॅव्हल्स चालक, नंदुरबार