शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचे चाकही पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने ...

नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने खासगी प्रवासी बसेस अर्थात ट्रॅव्हल्सचा मोठा वापर होतो, परंतु कोरोनामुळे नागरिकांचा प्रवास कमी झाला असल्याने जिल्ह्यातून धावणाऱ्या खासगी बसेस चालक-मालक व बुकिंग घेणाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.

नंदुरबार शहर ते पुणे, मुंबई, अहमदाबाद व सूरत या मार्गावर साधारण ४५ बसेस कोरोनापूर्वी चालविण्यात येत होत्या. आलिशान व्यवस्थेमुळे सामान्य प्रवासीही दोन पैसे खर्च करून यातून प्रवास करत होते, परंतु काेरोनामुळे हा प्रवास तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबला होता. नोव्हेंबर, २०२० पासून काही अंशी प्रवाशांची संख्या वाढत होती. यातून आलबेल सुरू असतानाच, गेल्या १५ दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची संख्या ही निम्म्यावर आली आहे. परिणामी, जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेसची संख्या ही निम्म्यावर आली असल्याची माहिती नंदुरबार शहरात ट्रॅव्हल्स बुकिंग घेणाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

गाडी रुळावर आल्यानंतर पुन्हा समस्या...

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर पुणे व मुंबई येथून शहरात येणाऱ्या व येथून पुन्हा जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या वाढली होती. प्रवाशांचे बुकिंग मिळू लागल्याने व्यावसायिकांचे मागील नुकसान भरून येण्यास सुरुवात होत होती. यात डिसेंबरपासून लग्नसराई सुरू झाल्याने व्यवसायामध्ये तेजी होती, परंतू जानेवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू झाली. यातून फेब्रुवारी मध्यापासून या व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. १ मार्चनंतर पुणे व मुंबई येथून येणाऱ्या काही गाड्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याची माहिती चालकांकडून देण्यात आली आहे.

चालक आणि वाहकांसह बुकिंग घेणारे अडचणीत

नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स या धुळे किंवा नाशिक येथील टूर्स कंपन्यांच्या आहेत. या ट्रॅव्हल्स चालक व मालकांकडून नंदुरबारात काहींना ऑनलाइन बुकिंग घेण्याचे अधिकार दिले आहेत. यातून कमिशन बेसिसवर काही होतकरू युवक दिवसभरात प्रवाशांच्या नोंदण्या करून सेवा देतात. या ट्रॅव्हल्सवरच शहरातील काही जण चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून या ट्रॅव्हल्सवर सेवा दिली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी झाल्याने बुकिंग घेणारे व चालक यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. दर दिवशी १० टक्के प्रवासी संख्या घटत असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार हे चालक आणि बुकिंग घेणारे बसेसमध्ये सर्व सोयी करून देत आहेत. यात प्रामुख्याने मास्कवाटप, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी पाणी व साबणही देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

होळीसाठी दरवर्षी पुणे येथून मोठ्या संख्येने नोकरदार येतात. सोबत मुंबई परिरसरातून अनेक जण येतात. परंतु होळी साधेपणाने साजरी होत असल्याने हे नागरिक येण्याची शक्यता मावळली आहे. दुसरीकडे लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे बाहेरगावी लग्नाला येणारे प्रवासी कमी आहेत. कोरोना वाढतोय, यामुळे अनेक जण कोणत्याही वाहनातून प्रवास करणे टाळत आहेत.

- तुकाराम चित्ते, ट्रॅव्हल्स चालक, नंदुरबार