लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे पालन हे सर्वच ठिकाणी परिणामकारक ठरत असून उन्हाळी पिकांचे लागवड क्षेत्रही यामुळे खालावले असल्याचे चित्र आहे़ आजअखेरीस जिल्ह्यात केवळ १९ हजार ३४० हेक्टर क्षेत्रातच उन्हाळी पिके तग धरुन आहेत़जिल्ह्यातील विविध भागात उन्हाळी धान्य पिकांसह, कडधान्य, तेलबिया, कांदा, भाजीपाला यासह टरबूज, केळी, पपई आणि ऊस आदी ४८ प्रकारच्या पिकांची लागवड करण्यात येते़ मे मध्यापर्यंत किमान साधारण ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या पुढे होणाऱ्या या पिकांच्या लागवडीला यंदा ब्रेक लागला आहे़ मार्चपूर्वी केलेल्या उत्पादनांच्या तोडीवर परिणाम होऊन बाजारपेठ नसल्याने खराब झालेला माल तसेच व्यापाऱ्यांकडून दिले जाणारे मातीमोल दर यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ याचा परिणाम एप्रिल व मे महिन्यात होणाºया उन्हाळी पिकांच्या लागवडीवर थेट झाला आहे़ यातून सावरण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन मिळत नसल्याने समस्या वाढत आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बाजारपेठेअभावी शेतमाल स्वत:च बाजारात आणत असतानाही त्यांना नुकसानच सहन करावे लागल्याने चिंता वाढल्या आहेत़ येत्या दोन आठवड्यानंतर खरीप पेरण्यांनाही सुरुवात होणार आहे़ त्यासाठीचे नियोजन करावयाचे असल्याने उन्हाळी पिकांकडे पाठ फिरवली जात आहे़ प्रामुख्याने जमिनीची प्रत सुधारणा व जमिन आरोग्य राखण्यासाठी या पिकांची लागवड केली जाते़ लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात बियाणे, मजूर, खते, इलेक्ट्रीक साहित्य, ठिबक यासह मजूरांचे नियोजन न झाल्याने शेतकºयांना अडचणी आल्या होत्या़ यातून उन्हाळी पिके बारगळले आहेत़४जिल्ह्यात आजअखेरीस सर्व सहा तालुक्यांमध्ये १९ हजार ३४० हेक्टरवर उन्हाळी पिके आहेत़४उन्हाळी बाजरी १ हजार ४२६ हेक्टर, उन्हाळी मका १ हजार ६१९, मूग १ हजार ४४४, भूईमूग १ हजार ४१, सूर्यफूल १८२, बार्टी ४१ या धान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांची एकूण ६ हजार ३५५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे़४तर दुसरीकडे फळे आणि भाजीपाला पिकांची एकूण १२ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे़ यात कांदा ७९०, वांगी ४७, मिरची ७५, भाजीपाला ४३२, टरबूज ८३४, केळी २७७, पपई ६७ तर ऊस ४ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आला आहे़ एकूण १२ हजार ९८५ हेक्टरवर ही पिके आहेत़विशेष बाब म्हणजे यंदाही उन्हाळी पिकातून ज्वारी, तीळ, सोयाबीन हे बाद झाले असल्याचे दिसून आले आहे़ तर लागवड पिकांचे क्षेत्र हे कमीच आहे़जिल्ह्यात मिरची लागवड ही मे महिन्यापासून सुरु होते़ तूर्तास मात्र ही कामे रखडली आहेत़ रोप तयार करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने चिंता आहे़बºयाच ठिकाणी पपईची लागवड केली गेली असली तरी खत, क्रॉपकव्हर, ठिबक नळ्या टाकणे यासह इतर कामांना मजूर नसल्याने पपई लागवड १०० हेक्टरच्या आत आहे़ जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे पपई तोड थांबून शेतकºयांचे नुकसान झाले होते़ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २ हजार १०० हेक्टर पपई लागवड होते़कमी दिवसात भरघोस उत्पादन म्हणून शेतकरी टरबूजाला पसंती देत आले आहेत़ यंदा रमजानच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी लागवड वाढण्याची शक्यता होती़ परंतू लॉकडाऊनमुळे आधीचा माल न विकला गेल्याने उन्हाळी लागवड रखडून क्षेत्र निम्मे झाले आहे़
कोरोनामुळे उन्हाळी पिकांचे लागवड क्षेत्रही झाले ‘डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:15 IST