शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

आदिवासी अधिकार मंचचे प्रकाशात अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:36 IST

दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन : पाच ठरावांना एकमताने मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर कपात करून सरकार सर्वसामान्यांसह गोरगरीब जनतेवर एकप्रकारे अन्याय करीत आहे. तर दुसरीकडे नवनवीन योजना राबवून भांडवलदारांना अधिकच प्रगत करत आहे, असा आरोप आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे राज्याचे अध्यक्ष सुनील धानवा यांनी येथील अधिवेशनात केला.प्रकाशा, ता.शहादा येथील सद्गुरू दगा महाराज धर्मशाळेत आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे दुसरे अधिवेशन येथे झाले. राज्याचे अध्यक्ष सुनील धानवा हे अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. येथील बसस्थानकापासून सकाळी साडे अकरा वाजता मिरवणूक काढण्यात आली. यात विविध पदाधिका:यांसह मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रम स्थळी मिरवणूक पोहोचल्यानंतर ध्वजवंदन करण्यात आले. तद्नंतर अध्यक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. किसान मंचचे ज्येष्ठ नेते जयसिंग माळी, सरपंच भावडू ठाकरे,  रूबाबसिंग ठाकरे, अंजू पाडवी, सुदाम ठाकरे, रवींद्र ठाकरे, मासूम मन्यार, इंदिरा चव्हाण, सुनील गायकवाड, तापीबाई माळीच, उत्तम पवार, खंडू सामुद्रे, मालती वळवी, हमीद शहा, जगन ठाकरे, सुभाष पाडवी, सुकलाल भिल आदी उपस्थित होते.याप्रसंगी विविध विषयांवर विचार विनिमय करण्यात आला. किसान सभेचे ज्येष्ठ नेते जयसिंग माळीच यांनी उद्घाटन पर भाषण केले. त्यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत उपाय योजना सुचविल्या. धानवा म्हणाले की, धर्मातर करून आदिवासी समाजात येणा:यांची संख्या वाढली आहे. हे थांबले पाहिजे. देशाचा मुळ निवासी आदिवासी असून, न्याय हक्कासाठी संघटीतपणे लढा            दिला जाईल. संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळणार नाही तरी एक दिलाने प्रय} होणे गरजेचे आहे. शिक्षणाची कास धरा. शिक्षणानेच आपण  प्रगल्भ होऊ. समाज एकवटला            तर गुलाम करण्याची ताकद  कुणाचीच नाही. सूत्रसंचालन अनिल ठाकरे तर आभार मालती वळवी यांनी मानले.मंचच्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष सुदाम ठाकरे, जिल्हा निमंत्रक दयानंद चव्हाण, सह निमंत्रक विक्रम वळवी, रवींद्र ठाकरे, अनिल ठाकरे, रामसिनग मोरे आदींचा समावेश असून, विस्तारीत कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल