शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा एकात्मिक प्रकल्पातील आश्रमशाळांचे बांधकाम रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात तळोद्यासह अक्कलकुवा, धडगाव या सारख्या १०० टक्के आदिवासींचा समावेश असलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात तळोद्यासह अक्कलकुवा, धडगाव या सारख्या १०० टक्के आदिवासींचा समावेश असलेला प्रकल्प असला तरी येथील बांधकाम विभाग गेल्या चार वर्षापासून प्रभारी अभियंत्यावरच सुरू आहे. वास्तविक गेल्या वर्षापासून प्रकल्पातील विविध शासकीय आश्रमशाळा व इतर इमारतींची ११८ कोटींची कामे सुरू असताना एक प्रकारे ते रामभरोसेच चालू असल्याचे चित्र आहे. साहजिकच प्रकल्पाला पूर्ण वेळ स्वतंत्र अभियंता द्यावा, अशी आदिवासी संघटनेची मागणी आहे.आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना गेल्या कित्येक वर्षांपसून करण्यात आली आहे. या विभागांतर्गतच राज्यात वेगवेगळ्या तालुकास्तरावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चालविले जात आहेत. त्यांच्या मार्फतच आदिवासींच्या डझनभर योनजांची अंमबजावणी केली जात असते. साहजिकच यामुळे प्रकल्पावर योजनांचा वाढता ताण लक्षात घेऊन सन २०१६ पासून प्रत्येक प्रकल्पात स्वतंत्र बांधकाम विभाग स्थापन करण्यात आला आहे. तथापि तळोदा प्रकल्पातील बांधकाम विभाग गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रभारी अभियंत्यांवरच सुरू आहे. आजतागायत अभियंत्यांचे पदच भरण्यात आलेले नाही. त्यामुळे कधी धुळ्याहून तर कधी नंदुरबारहून कारभार सुरू आहे.आठवड्यातून काही दिवसच हे अधिकारी उपस्थित राहत असल्यामुळे ते कामांना पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. परिणामी कामांचे नवीन प्रस्ताव, कामांची पाहणी याच्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. वास्तविक तळोदा प्रकल्पात गेल्या वर्षापासून विविध शासकीय आश्रमशाळा, कर्मचारी निवासस्थाने, सांस्कृतिक भवने, वसतीगृहे अशा ११८ कोटींची कामेसुरू आहेत. ही कामेदेखील रामभरोसेच सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या शिवाय प्रकल्पामार्फतच शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा योजना, अशा वेगवेगळ्या पायाभूत विकास योजनादेखील राबविल्या जात असतात. यावरही परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.तळोदा प्रकल्पात तळोद्यासह, अक्कलकुवा, धडगाव यासारखी १०० टक्के आदिवासी गावांचा समावेश आहे. त्यामुळे बांधकाम विभागातही स्वतंत्र पूर्णवेळ अभियंता असणे अपेक्षित आहे. मात्र हा विभाग स्वतंत्र स्थापन झाल्यापासून प्रकल्पाला अभियंताच मिळालेला नाही. हे पद प्रकल्पात उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प प्रशासनाकडून सातत्याने आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु त्यावर तातडीने कार्यवाही करण्याऐवजी उदासिन भूमिका घेतली जात आहे.सध्या राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे नेतृत्व पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी करीत आहेत. शिवाय त्यांचा मतदार संघदेखील तळोदा प्रकल्पातच समाविष्ट आहे. साहजिकच तळोदा प्रकल्पालादेखील पूर्णपणे अभियंता देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तशी मागणीही जोर धरू लागली आहे.तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या तीन तालुक्यातील नवीन १५ बांधकामांचा प्रस्ताव यंदा मंजुरीसाठी आदिवासी विकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. जवळपास १०० कोटी रूपयांपेक्षा अधिक निधीची मागणी सदर कामांसाठी करण्यात आली आहे. तथापि प्रशासकीय मान्यतेअभावी हे प्रस्ताव मंत्रालयात रखडले आहेत. सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीची कमरता असल्याचे सांगितले जात असले तरी आदिवासी विकास विभागाच्या निधीची स्वतंत्र तरतूद असते. त्यामुळे वरील कामांना अधिक प्रायोरीटी देण्याची अपेक्षा आहे. या कामांमध्ये बहुतेक कामे शासकीय आश्रमशाळांमधील मुला-मुलींच्या निवासांची आहेत. याशिवाय काही शासकीय वसतीगृहांचीदेखील आहेत. सद्या मुलांना पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागत असते तर काही ठिकाणी भाड्याच्या इमारतींमध्ये वसतीगृहे आहेत. साहजिकच विद्यार्थ्यांना पुरेशा जागेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आदिवासी विद्यार्थ्यांची अशी वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनाने तळोदा प्रकल्पाची ही प्रस्तावित कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आदिवासी पालकांची मागणी आहे. याबाबत खुद् पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशीही पालकांची अपेक्षा आहे.