शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना वन जमिनींवरून हाकलण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:08 IST

तीव्र आंदोलनाचा इशारा : न्यायालयात केंद्र कमी पडल्याचा लोकसंघर्ष मोर्चाचा आरोप

नंदुरबार : वन हक्क कायद्याची बाजू मांडण्यास केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात अपयशी ठरले आहे. आदिवासींना वन जमिनीवरून हाकलून लावण्याचे षडयंत्र खेळले जात असून त्या विरोधात  लोकसंघर्ष मोर्चा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात अला आहे. याबाबत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने  वन हक्क कायद्याला आव्हान देणा:या याचिकेत अंतरिम आदेश दिला असून हा आदेश प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या शपथ पत्रावर आधारित अंतरिम आदेश आहे.  एका बाजूला राज्य सरकारे आदिवासींनाअद्याप कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी न झाल्यामुळे न्याय न दिल्याबाबत जन संघटनांना लेखी देतात व दुस:या बाजूला मात्र सुप्रीम कोर्टात आदिवासी विरूद्ध वागतात याचा लोक संघर्ष मोचार्ने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.2006 च्या वनहक्क कायद्यायची अंमलबजावणी कायद्यानुसार त्वरीत व्हावी म्हणून लोकसंघर्ष मोचार्ने 2012 ला जळगांव ते मंत्रालय पदयात्रा आणि 2018 मध्ये मुंबईत हजारो आदिवासीं सह विराट उलगुलान मोर्चा काढला होता 2008 मध्ये कायदा लागू झाल्यावर या कायद्याची अंमलबजावणी अतिशय संथ गतीने सुरू आहे. देशभरात अजूनही 93 टक्की वनदाव्यांची सुनावणी बाकी आहे. त्यात मध्यप्रदेश मध्ये 3.5 लाख, कर्नाटकात 1.75 लाख, ओडिशा  1.5 लाख, गुजराथ 1.2 लाख  तर महाराष्ट्रात 1 लाख 75 हजार दावे अजूनही प्रलंबित आहेत.उपविभागीय समित्यांनी कुठलेही पुरावे न बघता सदर दावे अन्यायकारक रीतीने एकतर्फा फेटाळले आहेत ज्याविरुद्ध अपिलांची सुनावणी व 12 अ ची पडताळणी बाकी आहे. मुख्यमंत्र्यानी डिसेंबर अगोदर हे सर्व दावे निकाली काढू असे लेखी आश्वासनही दिले मात्र अद्यापही समाधानकारक प्रगती नाही. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान अंतरिम आदेश दिला आहे.  कुणाही आदिवासींवर अन्याय झाला व जंगलातून हुसकावून लावले गेले तर तीव्र संघर्ष करू असा इशाराही  लोकसंघर्ष मोर्चातर्फे काथा वसावे, गणेश पराडके, प्रदीप बारेला, मुनाफ तडवी, हिरालाल बारेला, पन्नालाल मावळे, ङिालाबाई वसावे, अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, अशोक पाडवी, रमेश नाईक, यशवंत ठाकरे, बुधाभाऊ, बाबूसिंग नाईक, प्रतिभा शिंदे , सचिन धांडे यांनी दिला आहे.