शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

मताधिक्याची परंपरा कायम टिकविण्यासाठी काँग्रेसची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:12 IST

आय.जी.पठाण । लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : गत लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या नवापूर विधानसभा मतदार संघातून ...

आय.जी.पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : गत लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या नवापूर विधानसभा मतदार संघातून यंदाही काँग्रेसला मताधिक्य मिळेल यासाठी नेते व कार्यकर्ते सरसावले आहेत. तर भाजपाकडूनही मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याने सर्वांकडुन सावध पवित्रा घेतला जात आहे.नवापूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला गेला आहे. २००९ ची सार्वत्रिक निवडणूक वगळता १९७२ पासून आमदार सुरूपसिंग नाईक यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या रुपाने धुळे व नंदुरबार जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून नवापूरची आजवर ओळख राहिली आहे. सलग नऊ वेळा माणिकराव गावीत यांनी काँग्रेस पक्षाकडुन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते नवापूरचेच असल्याने विधानसभा व लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला नवापूरातून मताधिक्य मिळत आले आहे.पहिल्यांदा काँग्रेस कडुन लोकसभेसाठी आमदार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या रुपाने नवापूर तालुक्याच्या बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. त्यांना उमेदवारी देण्यावरुन उद्भवलेली राजकिय असंमजसाची स्थिती निवळली आहे. मात्र मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ काँग्रेसला नवापूरात मिळत नसल्याचे चित्र आहे.विश्वासात घेऊन काम करीत नसल्याची उघड नाराजी माजी आमदार शरद गावीत यांनी बोलवून दाखवली असुन ते अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या प्रचारात सहभागी न होता डॉ. हिना गावीत यांच्या प्रचारार्थ गुंतले असल्याचीही मतदारसंघात चर्चा आहे.गेल्या निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार माणिकराव गावीत यांना एक लाख ४४५ मते तर भाजपा उमेदवार डॉ. हिना गावीत यांना ८७ हजार ५२७ मते मिळाली होती. मतांचा फरक पाहता मोदी लाटेतही काँग्रेसला भाजपा पेक्षा १२ हजार ९१८ मते जास्त मिळाली होती. लोकसभा मतदारसंघात केवळ नवापूर मतदारसंघाने काँग्रेसला लीड दिला होता. काँग्रेसला सुमारे एक लाखाचे मताधिक्य देखील नवापूरातून गतकाळात मिळालेले आहे. मताधिक्यासाठी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्यासारखे अनुभव संपन्न लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कामास लागले आहेत.दुसरीकडे आपला हक्क स्थापित व्हावा यासह मताधिक्य मिळविण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रदीप वळवी, अनिल वसावे, एजाज शेख, शैला टिबे, सविता जयस्वाल, कमलेश छत्रीवाला त्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपाचे काही जून्या पदाधिकाºयांनी बंडाळी केली असल्याने त्याचा परिणाम पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.