शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बाधीत प्रकरणी संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथून बिहारमध्ये गेलेल्या १८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथून बिहारमध्ये गेलेल्या १८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांची अक्कलकुवा येथे तपासणी होऊन देखील अवघ्या दोनच दिवसात हे विद्यार्थी पॉझिटिव्ह कसे निघतात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.अक्कलकुवा येथे शिक्षण घेत असलेल्या बिहार मधील अडीच हजार विद्यार्थ्यांना ५ मे रोजी विशेष रेल्वेने सहरसा येथे पाठविण्यात आले होते. पाठविण्यापूर्वी या विद्यार्थ्यांची स्थानिक संस्था आणि प्रशासनातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात एकाही विद्यार्थ्याला कुठलेही लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले. अक्कलकुवा येथून वाहनाने त्यांना नंदुरबार स्थानकापर्यंत आणण्यात आले. रेल्वे स्थानकात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना रेल्वेत बसविण्यात आले.रेल्वे प्रशासनाने विद्यार्थी येण्याआधी, आल्यावर व रेल्वे गेल्यावर रेल्वेसह संपुर्ण परिसर वेळोवेळी सॅनिटाईज केला. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना आसन देण्यात आले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उपस्थितीत रेल्वे रवाना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सहरसा येथे रेल्वे पोहचल्यावर तेथे सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काहींचे स्वॅब घेण्यात आले. त्यात पहिल्या दिवशी तीन, नंतर प्रत्येकी सात व आठ अशा १८ विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.काही राष्टÑीय न्यूज चॅनेला बातम्या आल्या. त्यात नंदुरबारचे नाव स्पष्टपणे घेण्यात आले. परंतु येथील प्रशासनाने त्याबाबत काहीही स्पष्ट केले नाही. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून तर्कवितर्कही लावले जात आहेत.या बाबतच्या बातम्या राष्टÑीय न्यूज चॅनेलने देखील दाखविल्या. तेथील जिल्हाधिकाºयांनी याबाबत माहितीही दिली आहे.संबधीत संस्थेने यापूर्वीच निवेदन देवून विद्यार्थ्यांची योग्य ती आरोग्य तपासणी केली गेल्याचे म्हटले आहे.