शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

तळोद्यात भाजीपाला टंचाईसह उपलब्ध भाज्यांचे दर दुपटीने वाढल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झाली असून उपलब्ध भाजीपाल्याचे दर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झाली असून उपलब्ध भाजीपाल्याचे दर दुपटी आणि तिपटीने वाढल्याचे नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्व बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत़ तळोदा शहराला भाजीपाला पुरवठा करण्याचा एकमेव मार्ग असलेल्या मार्केट यार्डात भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आल्यानंतर शहरात भाजीपाला आवक कमी झाली आहे़ यातून मिरची प्रति किलो थेट १६० रुपयांना विक्री होत आहे़ बटाटे प्रतिकिलो ४० ते ५०, कांदे ५० तर पालेभाज्यास थेट ६० रुपये प्रतिकिलो दरांमध्ये मिळू लागल्या आहेत़विशेष म्हणजे ५ रुपयात जुडी मिळणारी कोथिंबीर आता थेट १० ते २० रुपयांपर्यत जाऊ पोहोचली आहे़ भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यांचे दर हे नियमित ठेवण्याची अपेक्षा या काळात होती़ परंतू तळोदा शहरात या नियमनाला खो दिला जात आहे़ भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना भाजीपुरवठा करणाऱ्यांकडून दर वाढ करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून नाईलाजाने दरवाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा प्रकार थांबवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तळोदा शहरात भाजीपाला पुरवठा करणारे शेतकरी नियमित दरानेच भाजीपाला पुरवठा करत असताना अचानक वाढवण्यात आलेल्या दरांचे रहस्य प्रशासनाने जाणून घेण्याची अपेक्षा आहे़ तालुक्यातील ग्रामीण भागातून साधारण २० ते २५ किलोमीटर अंतरातील गावांमधील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येत आणत असल्याने त्याच्या वाहतूकीसाठी खूप मोठा वाहतूक खर्च लागत नसल्याने दरवाढीची कोणतीही सबब मान्य होत नसल्याने प्रशासनाने भाजीपाला खरेदी करणारे तसेच किरकोळ विक्रेत्यांसोबत संंवाद साधून योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे़