शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोठली आश्रमशाळेत किचन गार्डनची संकल्पना यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आश्रमशाळेत स्थानिक ठिकाणीच पिकविलेला सेंद्रीय भाज्या विद्याथ्र्याना दैनंदिन आहारात पुरविल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आश्रमशाळेत स्थानिक ठिकाणीच पिकविलेला सेंद्रीय भाज्या विद्याथ्र्याना दैनंदिन आहारात पुरविल्या जात आहेत. वांगे, टमाटे, मेथी, दुधी  आदी भाज्यांचे या ठिकाणी उत्पादन घेतले जात आहे. ‘किचन गार्डन’ची कोठली आश्रमशाळेतील संकल्पना यशस्वी ठरली आहे. कोठली आश्रम शाळेत बारावीर्पयतचे वर्ग आहेत. याच आश्रम शाळेने राज्यातील पहिली आयएसओ मानांकन असणारी आदिवासी आश्रमशाळेचा मान देखील मिळविलेला आहे. शाळेतील विविध उपक्रम आदर्शवत आहेत. जिल्हाधिका:यांनी ही शाळा दोन वर्षापूर्वी दत्तक देखील घेतली होती. त्यांच्याच संकल्पनेतून त्यावेळी किचन गार्डन अस्तित्वात आले होते.आश्रम शाळेच्या या गार्डनमधून आता विविध भाजीपाला निघू लागला आहे. आश्रम शाळेचा विस्तीर्ण परिसराचा उपयोग या किचन गार्डनसाठी करण्यात आला आहे. सध्या येथून वांगे, टमाटे मोठय़ा प्रमाणावर निघत आहेत. मेथीचे देखील उत्पादन येथून घेण्यात आले होते. दुधीभोपळा आणि इतर वेलवर्गीय भाजीपालाही घेतला जातो. साधारणत: 15 गुंठे क्षेत्रात वांगे, दहा गुंठे क्षेत्रात टमाटे, 10 गुंठय़ांमध्ये मेथी तर इतर भाजीपाला तीन गुंठय़ात घेण्यात आला. भाजीपाल्यासाठी कुठलेही रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर केला जात नाही. नैसर्गिकरित्या आणि सेंद्रीय पद्धतीने हा भाजीपाला पिकवला जातो. आश्रम शाळेत असलेल्या कुपनलिकेच्या माध्यमातून त्याला पाणी पुरविले जाते. विद्यार्थीनींच्या दैनंदिन आहारात या पालेभाज्यांचा उपयोग केला जातो.  स्थानिक ठिकाणीच पिकविलेल्या भाजीपाल्यातून सकस आहार विद्यार्थीनींना मिळत असल्यामुळे विद्यार्थीनींसह पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.प्रकल्प अधिकारी वान्मती सी. यांनी देखील या उपक्रमाचे वेळोवेळी कौतूक केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक बी.आर.मोरे, प्रा.ए.जे.पाडवी, प्रा.पी.आर.पाटील, प्रा.एस.पी.भाले, प्रा.डी.एम.पाटील, प्रा. एम.एल.कर्णकार, प्रा.ए.बी.भदाणे, भानुदास पाटील हे त्यासाठी         वेळोवेळी परिश्रम घेत आहेत. गावाचे सरपंच यांनीदेखील यासाठी        मोलाची मदत केल्याचे सांगण्यात आले.येथील आश्रम शाळेत जिल्हाभरातील विविध भागातील आदिवासी विद्यार्थीनी शिकण्यासाठी आहेत. त्यांना सकस आहार मिळावा यासाठी आश्रमशाळा व्यवस्थापनाचा नेहमीच प्रय} असतो.त्याअंतर्गतच आवारात किचन गार्डनचा उपक्रम राबविण्यात आला. तो उपक्रम शाळा व्यवस्थापनाने उत्कृष्टरित्या यशस्वी केला आहे. परिणामी या ठिकाणी विविध भाजीपाला पिकू लागला आहे.येत्या काळात किचन गार्डन आणखी व्यापक स्वरूपात करण्याचे नियोजन प्रकल्प अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळा व्यवस्थापनाने केले आहे.