शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नंदुरबारातील मूलभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा : आदिवासी विभागाचे केंद्रीय सहसचिवांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय यंत्रणांनी मूलभूत सुविधांची कामे योग्य कालावधीत पूर्ण करीत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे, सहसचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत राजेश अग्रवाल यांनी विविध सूचना केल्या़  बैठकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय यंत्रणांनी मूलभूत सुविधांची कामे योग्य कालावधीत पूर्ण करीत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे, सहसचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत राजेश अग्रवाल यांनी विविध सूचना केल्या़  बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, तळोदा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विनय गौड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.सचिव अग्रवाल म्हणाले की, जिल्ह्यात विद्युतीकरण करून प्रत्येक शाळा, वसतीगृह, आश्रमशाळेत अखंडीत विद्युतपुरवठा करावा तसेच शेतीसाठी प्रत्येक गावात 24 तास वीज मिळेल असे नियोजन करावे. आरोग्य सुविधेसाठी दुर्गम भागात पुरेसे डॉक्टर, आशावर्कर असणे आवश्यक असून, जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करावे. रुग्णास 108 रुग्णवाहिकेची सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातच रुग्णास सर्व सुविधा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रातील साधन सामुग्री अद्ययावत व सुस्थितीत ठेवाव्यात ज्यामुळे रुग्णास उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता भासणार नाही.