शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

चेडापाडा ग्रामस्थांची रेशनबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  रेशनच्या धान्याची अफरातफर करणा:या बचत गटावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  रेशनच्या धान्याची अफरातफर करणा:या बचत गटावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील चेडापाडा ग्रामस्थांनी केली आहे.      नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांना चेडापाडा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला बचतगटास शासनाने शिधापत्रिका धारकांना रेशन वाटपासाठी नियुक्त केले आहे. मात्र या बचतगटाकडून शिधापत्रिका धारकांना शासनाने ठरविलेल्या मासिक मानकानुसार धान्य वेळेवर वाटप केले जात नाही. महिन्यातून फक्त एक ते तीन दिवसच धान्य वाटप करतात. तेथील फलकावर धान्य किती शिल्लक आहे व धान्य प्रति किलो काय दराने वाटप करावयास हवे याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती लिहिली जात नाही. नेहमी फलक कोराच असतो. त्यातच ज्या थोडय़ाफार लोकांना धान्य वितरीत होते त्यांना पावतीदेखील दिली जात नाही. गेल्या 10 वर्षात एकही नवीन शिधापत्रिका वितरीत करण्यात आलेली नाही. अश्या अनेक तक्रारी या बचतगटा विरुध्द असतांना 14 जुलै रोजी या बचगटाने रेशनचा शासकीय गहु, तांदुळ व इतर धान्य परस्पर विक्री व चोरटी वाहतूक करण्याच्या हेतुने खाजगी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 39 - एच 0026 व ट्रॉली क्रमांक  एमएच 39 - एफ 8192 याव्दारे घेऊन जात असतांना गावक:यांनी पकडले असता ट्रॅक्टर पकडणा:या गावक:यांना तुम्हा सर्वाना बघून घेऊ अश्या धमक्या देण्यात आल्या. घटना घडली त्यावेळी पोलीस कर्मचारी सुध्दा हजर होते. रेशनच्या धान्याची अफरातफरच्या घटनेचा पुरावा म्हणून सर्व गावक:यांच्या समक्ष केलेल्या चित्रिकरणाची व्हिडिओफीत व फोटो सादर करण्यात आले       आहे. धान्याची अफरातफर करणा:या व गोरगरीबांच्या हक्काचा रेशन हडप करणा:या चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला बचतगट व रेशनदुकानदाराचा कायमस्वरुपी परवाना रद्द करावा व संबंधित बचतगटातील सर्व सदस्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात यावी. जेणे करून हे सर्व सदस्य भविष्यात दुस:याच्या नावाने बचत गट तयार करू शकणार नाहीत व नवीन परवाना घेऊ शकणार नाहीत असे नमूद करून संबंधित बचतगटधारक  व रेशनदुकानदाराची चौकशी करून योग्य व कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे निवेदनाद्वारे सुनीता रामदास वळवी, बेबी किशोर वळवी, मनीला अनिल वळवी, रुखा सुनील वळवी, मंगला जगदीश वळवी, सुनीता वळवी,  सुनीता जयराम भिल, सुना किशन वसावे, रेहाना भरत वळवी यांनी म्हटले आहे.