शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

कंपनीचे ४४ हजार वीज ग्राहकांकडे थकले २२ कोटी रुपयांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

एकूण २२ कोटी रुपयांच्या थकबाकीत केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज बिलांच्या थकीत रकमेचा समावेश ...

एकूण २२ कोटी रुपयांच्या थकबाकीत केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज बिलांच्या थकीत रकमेचा समावेश आहे. बिल थकीत असलेल्या ४४ हजार ग्राहकांपैकी १ हजारपेक्षा अधिक ग्राहकांची वीज बिलांची रक्कम ही लाख रुपयांच्या पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी हे वीज बिल वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीकडून बिलांच्या वसुलीची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली असून मोठ्या रकमा असलेल्या ग्राहकांसोबत दरदिवशी संपर्क करून वीज बिल भरण्यासंदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र दर महिन्यात होणाऱ्या वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत असल्याने मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांकडे शिल्लक असलेल्या थकबाकीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कंपनीकडून वसुली केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान कंपनीकडून इन्स्टाॅलमेंट पद्धतीने वीज बिल भरण्याची मुभा देेण्यात आली असल्याने ग्राहकांना सोयीचे झाले असल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाज करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तिन्ही ठिकाणच्या वीज बिलांचा भरणा ग्राहकांनी करावा यासाठी त्यांना वेळोवेळी सुचवले जात आहे. ग्राहकांचे वीज बिल अधिक असल्यास त्यांना टप्प्याटप्प्याने बिल भरता यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व प्रकारच्या बिलांची योग्य पद्धतीने वसुली करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य केल्यास जिल्ह्यातील थकीत बिलांची वसुली लवकर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीज कंपनीने चांगली योजना आणली आहे.

-अनिल बोरसे,अधीक्षक अभियंता, नंदुरबार.

नंदुरबार जिल्ह्यातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे सद्य:स्थितीत ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण २५८ कोटी ८० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या ४८६ कोटी ५१ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २४३ कोटी २५ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ४४ हजार ३२३ ग्राहकांकडे २२ कोटी रुपयांची बिलांची रक्कम थकीत आहे. रकमेची वसुली करण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण स्वीकारले गेले आहे. यातून काही ठिकाणी नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातही याचप्रकारे कामकाज सुरू आहे.