शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

जिल्हा परिषदेने सुचवलेली गावे नियोजन समितीने वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 17:24 IST

नंदुरबार : ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी नसलेल्या गावांची यादी जिल्हा नियोजन समितीने परस्पर बदलून घेत जिल्हा परिषदेने सुचवलेली गावे ...

नंदुरबार : ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी नसलेल्या गावांची यादी जिल्हा नियोजन समितीने परस्पर बदलून घेत जिल्हा परिषदेने सुचवलेली गावे वगळल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ जनसुविधा योजनेंतर्गत जिल्हा परिषदकडून 191 गावांमध्ये कामे सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी करण्यात आली होती़ परंतू समितीकडून 40 गावांच्या नावांनाच मंजूरी देण्यात आली होती़     बुधवारी दुपारी सर्वसाधारण सभा याहामोगी सभागृहात घेण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी उपाध्यक्ष सुहास नाईक, आरोग्य व शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, सभापती दत्तू चौरे, सभापती आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे व्यासपीठावर उपस्थित होत़े सभेच्या प्रारंभी मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात येऊन 15 विषयांवर चर्चा सुरु करण्यात आली़ दरम्यान गेल्यावेळी केलेल्या सभेच्या ठरावांचा आढावा घेण्यात येऊन कामकाज करण्यात आल़े यात एप्रिल महिन्यात कार्यालयांअभावी असलेल्या 51 ग्रामपंचायतींसाठी ठराव करण्यात येऊन त्यासोबत 140 कामांची यादी जिल्हा नियोजन समितीकडे निधी पूर्ततेसाठी पाठवण्यात आली होती़ या ठरावाचा आढावा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्याकडून सादर होत असताना सदस्य रतन पाडवी, सागर तांबोळी यांनी आक्षेप नोंदवला़ त्यांच्याकडून जिल्हा परिषदेने पाठवलेल्या गावांची यादी मागण्यात आली़ या यादीतील गावे ही जिल्हा परिषदेने सुचवलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पदाधिकारी आणि सदस्य यांनी समितीच्या कामावर नाराजी व्यक्त करुन जिल्हा परिषदेच्या कामात जिल्हा प्रशासन ‘ढवळाढवळ’ करत असल्याचा आरोप केला़  जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक व उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीने परस्पर केलेल्या बदलांवर नाराजी व्यक्त करुन पुन्हा नव्याने गावांना मंजूरी देण्याची मागणी करुन ठराव करण्याचे सुचवल़े समितीने जिल्हा परिषदेने सुचवलेली केवळ 40 गावे मंजूर करत त्यांना निधी दिल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पठारे यांनी दिल्यानंतर सदस्यांकडून एकच गदारोळ सुरु झाला़ नव्याने मंजूर करण्यात आलेली 140 गावे जिल्हा परिषदेने सुचवलेली नसल्याचे पदाधिका:यांनी सांगितल़े यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे यांनी स्पष्टीकरण दिल्यावर अध्यक्षा रजनी नाईक यांनी समितीकडे विचारणा करण्याचे सांगून प्रस्तावांवर कारवाई करण्याचे आदेश दिल़े सभेत विभागवार आढावा घेण्यात येऊन 15 विषयांना मंजूरी दिली गेली़ 29 रोजी मुदत संपत असल्याने जिल्हा परिषदेची ही शेवटची सभा असल्याचे जाहिर करुन समारोप झाला़